अश्विनला दिल्लीचा कर्णधार करा

मुंबई (प्रतिनिधी): आगामी हंगामात दिल्ली कॅपिटल्सने ऑफस्पिनर आर. अश्विनला दिल्लीचा कर्णधार करा, अशी सूचना माजी सलामीवीर, खासदार गौतम गंभीरने फ्रँचायझीला केली आहे.


पुढील मोसमात ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने संघाचे नेतृत्व करावे. आयपीएलचा मोठा लिलाव पुढील हंगामापूर्वी होणार आहे. अशा स्थितीत दिल्लीचे कोणते खेळाडू त्यांच्यासोबत कायम राहतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मी अश्विनच्या सर्वात मोठ्या चाहत्यांपैकी एक आहे. तो जगातील सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी एक आहे. जर तुम्ही संपूर्ण लाईनअप पाहिली तर हा एक विचित्र निर्णय असू शकतो, पण जर मी तिथे असतो, तर मी त्याला पुढच्या वर्षी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार बनवले असते, असे गंभीरने म्हटले आहे.


गौतम गंभीर हा कोलकाता नाईट रायडर्सला दोन वेळा आयपीएल जेतेपद मिळवून देणारा कर्णधार आहे. त्यानंतर तो २०१९ मध्ये पुन्हा दिल्लीच्या संघात परतला. या मोसमात त्याने अर्ध्यातच संघाचे कर्णधारपद सोडले आणि श्रेयस अय्यर कर्णधार झाला.


दिल्लीने सलग तिसऱ्यांदा आयपीएल प्ले-ऑफ फेरी गाठली पण तीनही वेळा जेतेपद मिळवण्यात ते अपयशी ठरले. श्रेयस अय्यरने २०१९ आणि २०२० मध्ये या संघाचे कर्णधारपद भूषवले, तर यंदाच्या मोसमात रिषभ पंतला कर्णधार करण्यात आले, कारण अय्यर हंगामापूर्वी जखमी झाला होता. या हंगामाच्या पहिल्या टप्प्यात पंतला कर्णधारपद मिळाले. अय्यर दुसऱ्या टप्प्यात परतला पण तरीही पंतला कर्णधार म्हणून कायम ठेवण्यात आले.


Comments
Add Comment

युवा भारत सहाव्यांदा विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडवर 'वैभव'शाली विजय

हरारेत तिरंगा डौलाने फडकला हरारे  : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट

टी-२० विश्वचषकाचा शनिवारपासून रणसंग्राम, भारतासमोर अमेरिकेचे कडवे आव्हान

मुंबई : टी-२० विश्वचषकाचा बिगुल वाजला असून, गतविजेता भारतीय संघ शनिवारी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे

हरारेत सूर्यवंशीचा शतकी 'तांडव', कर्णधार आयुष म्हात्रेची भक्कम साथ

हरारे : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने इंग्लंडविरुद्ध धावांचा पाऊस

शनिवारपासून सुरू होणार टी२० क्रिकेटचा थरार

मुंबई : पुरुषांचा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या विश्वचषकाचा अंतिम

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभवची वादळी खेळी; फक्त ३० चेंडू आणि ....

मुंबई : सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आणि

WPL 2026 Final: स्मृती मनधानाच्या आरसीबीची विजयी घोडदौड सुरूच; दुसऱ्यांदा पटकावलं WPL चं जेतेपद

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ चा गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी वडोदरा येथील बीसीए