दसरा असूनही बाजारामध्ये शुकशुकाट

नालासोपारा (वार्ताहर) : दसरा असूनही वसई-विरारमध्ये बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. कोरोनाच्या काळात अनेकांचे नोकरीधंदे गेले आणि त्यामुळे नागरिकांना पूर्वीसारखा महागाईचा सामना करता येत नाही. त्यातही फुले आणि फळांचे दर वाढल्याने नागरिकांना खरेदी करणे कठीण जात होते. दरम्यान, ग्राहकांनी पाठ फिरवल्याने फेरीवालेसुद्धा निराश होते.


दरवर्षी दसऱ्यानिमित्त बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. वसई-विरार स्थानकाबाहेर फूल विक्रेता व फळ विक्रेत्यांची रांग लागलेली असते. यंदाही फेरीवाल्यांनी समान विकण्याची संपूर्ण तयारी केली होती; परंतु नागरिकांचा खरेदीला तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. कोरोनाचा काळ असताना अनेकांचे नोकरीधंदे गेले आणि त्यामध्येच नागरिकांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागला. यामुळे उभ्या राहिलेल्या आर्थिक टंचाईमुळे बाजारपेठांमध्ये शुकशुकाट असल्याचे पाहायला मिळाले. याचबरोबर फुलांचे दर हे ७० आणि ८० रुपये झाले आहेत. फळेही शंभर रुपये किलोने मिळू लागल्याने नागरिक सध्या हैराण झालेले आहेत. महागाईचे सावट असल्याने तसंच नोकरी धंदा नसून आर्थिक टंचाई असल्याने बाजारपेठांमध्ये शांतता पाहायला मिळाली. ग्राहकांची गर्दी नसल्याने अपेक्षित धंदा न झाल्याने फेरीवालेदेखील निराश होते.


दसऱ्याच्या दिवशी फुलांची आणि फळांची चांगली विक्री होईल, अशी आशा होती. पण तसे झाले नाही. दोन दिवस आधी सामान भरण्यास सुरुवात केली, तरी नागरिकांची गर्दी दिसून आली नाही. - गोपी मारू, फूल विक्रेता


दसऱ्याला चार हजारांपर्यंतच विक्री होते; परंतु, यंदा विक्रीत घट झाली. ग्राहकांनी महागाईचे कारण देऊन कमी सामान घेतले. त्यामुळे धंदा झाला नाही. - अश्विनी बोबडे, फेरीवाले

Comments
Add Comment

FYJC : अकरावी प्रवेशासाठी मंगळवार ४ ऑगस्टपासून विशेष फेरी

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत १५ लाखांहून

Devendra Fadnavis : राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील शालेय शिक्षण क्षेत्रात अभिनव उपक्रमांची अंमलबजावणी https://prahaar.in/2026/08/03/promotion-for-18-officers-of-the-legislature-secretariat/ शालेय

Mumbai Metro : मेट्रो -६ प्रकल्पाचे ८८ टक्के काम पूर्ण, कारशेडचा प्रश्न कायम

मुंबई : स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-विक्रोळी मेट्रो-६चे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असले तरी कांजुरमार्ग कारशेडचा

Sumantrao Pendharkar : 'विको'ला जागतिक ओळख देणारे उद्योगरत्न सुमंतराव पेंढरकर यांचे निधन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई : प्रसिद्ध आयुर्वेदिक उत्पादन कंपनी 'विको लॅबोरेटरीज'ला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणारे उद्योगपती आणि

Maharashtra Vidhan Bhavan : विधान मंडळ सचिवालयातील १८ अधिकाऱ्यांना पदोन्नती

मुंबई : महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयातील उपसचिव, अवर सचिव, अवर सचिव (समिती) आणि कक्ष अधिकारी अशा एकूण १८ पदांवर

Mohan Bhagwat : सरसंघचालक मुंबईत साधणार 'जेन-झीं'शी संवाद

मुंबई : देशातील तरुण पिढी सध्या लोकशाही, नेतृत्व आणि राष्ट्रउभारणीसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सक्रियपणे