जि.प. माध्यमिक शाळा कवाडा ठाकरपाडा ठरली तंबाखूमुक्त शाळा

तलासरी (वार्ताहर) : तलासरी पंचायत समिती अंतर्गत कवाडा ठाकरपाडा (केंद्र झरी) या जिल्हा परिषद माध्यमिक शाळेने तंबाखूमुक्त अभियानाचे ९ निकष पूर्ण केले. त्यामुळे सलाम मुंबई फाऊंडेशन व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यच्यावतीने पालघर जिल्हा समन्वयक मिलिंद रूपचंद पाटील यांनी तंबाखूमुक्त शाळा म्हणून जिल्हा परिषद माध्यमिक शाळा कवाडा ठाकरपाडा शाळेचे नाव घोषित केले आहे.


जिल्हा परिषद शिक्षण विभाग पालघर, तंबाखू नियंत्रण उपक्रम कार्यक्रम, सलाम मुंबई फाऊंडेशन व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा, खासगी शाळा, महाविद्यालयात तंबाखूमुक्त अभियान राबवण्यात आले आहे. यासाठी पालघर जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांची एक दिवसीय ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) लता सानप आणि (माध्यमिक) संगिता भागवत, तसेच पालघर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी यांनी आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळा लवकरात लवकर तंबाखूमुक्त कराव्यात, असे आवाहन करण्यात आले होते.


सलाम मुंबई फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक जयेश माळी, सलाम मुंबई फाऊंडेशनचे प्रतिनिधी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे पालघर जिल्हा समन्वयक मिलिंद रूपचंद पाटील, तलासरी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी के. बी. सुतार, झरी केंद्राच्या केंद्रप्रमुख संजय प्रधान यांच्या मार्गदर्शनाने कवाडा ठाकरपाडा शाळेचे मुख्याध्यापक (प्राथमिक) सुशिला सुधाकर तिरपुडे, प्रभारी मुख्याध्यापक (माध्यमिक) नवीन केशव धोडी, शाळा व्यवस्थापन समिती शाळा कवाडा ठाकरपाडा, पालकवर्ग व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने सदर निकषांची पूर्तता केली.


सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना तंबाखूमुक्तची शपथ दिली. तंबाखू नियंत्रणावर आधारित उपक्रम राबवले. शाळेच्या १०० मी. यार्ड परिसरात तंबाखू विक्री व सेवन करणाऱ्या व्यक्तीला दंड आकारण्यात येईल, याबाबत गावात जनजागृती केली. शाळेच्या १०० यार्डपर्यंत परिसर दिसेल, असा पिवळ्या रंगाने रेखांकित करून तेथे तंबाखूमुक्त क्षेत्र लिहून तंबाखूमुक्त क्षेत्र जाहीर केले व आपली शाळा तंबाखूमुक्त केली.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.