उड्डाणपूल दुरुस्ती सुरू होताच वाहतूक कोंडी

मोनिश गायकवाड


भिवंडी : भिवंडी शहराच्या स्व.राजीव गांधी उड्डाणपुलाची दुरवस्था झाली असताना त्याच्या दुरुस्तीसाठी मागील कित्येक दिवसांपासून हा उड्डाणपूल अवजड वाहतुकीस बंद होता. आता उड्डाणपूल दुरुस्ती कामास प्रारंभ झाला असून, रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्यास सुरुवात झाली आहे.


नुकतीच या उड्डाणपुलाच्या कामास पालिकेने मंजुरी दिल्यानंतर महापौर प्रतिभा पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी आयुक्त सुधाकर देशमुख, शहर अभियंता एल. पी. गायकवाड, वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र मायने उपस्थित होते.


दरम्यान वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी ११ ऑक्टोबर ते ३१ जानेवारी असा तब्बल ११३ दिवस उड्डाणपूल बंद राहणार असल्याची अधिसूचना काढली होती, तर पालिका प्रशासनाने दोन महिने उड्डाणपूल दुरुस्ती कामी बंद राहणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले होते. उड्डाणपूल दुरुस्तीच्या कामास प्रारंभ झाला असून त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्यास सुरुवात झाली आहे.


कल्याण नाका ते धामणकर नाका या रस्त्यांच्या दोन्ही बाजूला अनेक अतिक्रमण व अनेक बंद व मोठी वाहने उभी असल्याने याकडे पालिका अतिक्रमण विभाग व वाहतूक पोलीस विभाग दुर्लक्ष करीत असल्याने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. थातूरमातूर कारवाई होत असल्याने या कारवाईचा काहीही प्रभाव अतिक्रमण करणाऱ्यांवर होत नाही. या रस्त्यावरील अतिक्रमण केलेल्यांवर कारवाई करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.



उड्डाणपूल चार महिन्यांसाठी बंद


उड्डाणपुलाची दुरुस्ती होत असताना संपूर्ण उड्डाणपूल चार महिन्यांसाठी वाहतुकीकरिता बंद राहणार असल्याने शहरातील नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापौर प्रतिभा पाटील यांनी केले आहे. शहरातील अवजड वाहतूक पूर्ण बंद करून ती पर्यायी मार्गाने वळविण्यात आली असून त्या मार्गांचा अवलंब वाहन चालकांनी करावा असे आवाहन वाहतूक विभागा तर्फे राजेंद्र मायने यांनी केले आहे.

Comments
Add Comment

Prabhakar Shinde : मुंबई पूरमुक्त करण्यासाठी महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनामधील समन्वय आवश्यक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रेल्वे कल्वर्टच्या भिंतींची दुरुस्ती करून कल्वर्टचे पातमुख विस्तारण्यावर भर द्यावा.

Mayor Ritu Tawde : सुधा पार्क मार्गावरील समस्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी, महापौरांची Action मोहीम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर मधील सुधा पार्क रस्त्यावर दुतर्फा अनधिकृतरित्या उभी केली जाणारी वाहने आणि

Maharashtra : राज्यात पेट्रोल, डिझेल, LPG टंचाई नाही

मुंबई : पश्चिम आशियातील तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या जलवाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

Air India : अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचा एअर इंडिया व्यवस्थापनाला दणका

मुंबई : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्याय, त्रास व

Eknath Shinde : आयुष्मान आरोग्य मंदिर व वैद्यकीय महाविद्यालय प्रकल्प लवकरच नागरिकांच्या सेवेत

राज्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आयुष्मान आरोग्य मंदिर आणि वैद्यकीय महाविद्यालय

Healthcare Services : आरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता व गतीला प्राधान्य द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध