कोळशाच्या खाणींच्या लिलावाचा पुढील टप्पा सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पहिल्या दोन टप्प्यात २८ कोळशाच्या खाणींचा यशस्वी लिलाव केल्यानंतर, कोळसा मंत्रालयाने ४० नवीन कोळसा खाणींची (कोळसा खाणी विशेष तरतूद कायद्यांतर्गत २१ नवीन खाणी आणि एमएमडीआर कायद्याच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत १९ नवीन खाणी) लिलाव प्रक्रिया सुरू केली . यापूर्वीच्या टप्प्यातील कोळशाच्या खाणी धरून एकूण ८८ कोळसा खाणी लिलावासाठी उपलब्ध केल्या जातील. दरम्यान, आत्मनिर्भर भारतासाठी आयात कमी करण्यावर भर असल्याचे केंद्रीय कोळसा, खाण आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशीयांनी सांगितले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोळसा मंत्रालय आणि केंद्र सरकार कोळसा क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी संसाधने खुली करत आहेत. कोकिंग कोल ब्लॉक्ससाठी प्रोत्साहन देण्याबाबत चर्चा सुरू असल्याचेही ते म्हणाले. या उपाययोजनांमुळे संभाव्य बोलीदारांचा सहभाग वाढण्यास मदत होईल, असे जोशी म्हणाले. दरम्यान, कोळसा क्षेत्र पाच ट्रिलियन डॉलर्सच्या भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वप्न साकार करण्यात मोठी भूमिका बजावेल, असे कोळसा, खाण आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पटेल दानवे यांनी सांगितले.



कोळसा उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्नशील


सर्व उपलब्ध स्रोतांकडून औष्णिक विद्युतउत्पादन केंद्रांकडे येणारा कोळसा पुरवठा वाढल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. कोल इंडिया लिमिटेडसह इतर स्रोतांकडून होणारा एकूण कोळसा पुरवठा दोन दशलक्ष टनांपेक्षा जास्त नोंदवल्याचे मंत्र्यांनी केला आहे. विद्युत उत्पादन केंद्रांकडे पुरेसा कोळसा साठा असावा म्हणून या केंद्राकडे अधिक कोळशाचा पुरवठा व्हावा याची काळजी घेतली जाईल असेही जोशी यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

आता बोला? एकाच घरात ४,२७१ मतदार!

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात त्रिस्तरीय पंचायत निवडणुकीच्या मतदार यादीत मोठी अनियमितता समोर

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या