माथेरान शटल सेवेत आता केवळ दोनच डबे



नेरळ (वार्ताहर) : मिनिट्रेनची माथेरान-अमन लॉज-माथेरान या शटल सेवेची वाहतूक करणाऱ्या रेल्वे प्रशासनाने बनवेगिरी सुरू केली आहे. पर्यटक प्रवाशांची गर्दी असतानाही एक प्रवासी डबा कमी लावला जात असून तो माथेरान स्थानकात उभा ठेवण्यात आला आहे. दरम्यान, तो प्रवासी डबा तत्काळ लावण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.


ऐन दिवाळीच्या तोंडावर शटल सेवेचा एक डबा कमी करण्यात आला. अमन लॉज ते माथेरान स्टेशनपर्यंतची रेल्वेची शटल सेवा पर्यटक आणि स्थानिकांसाठी मोठी सुलभ व फायदेशीर ठरली आहे. सुरुवातीला पाच सेकंड क्लासच्या डब्यांनी सुरू केलेली मिनी ट्रेनची शटल सेवा तीन डब्यांवर आली होती. दरम्यान, गेल्या आठवड्यापासून आणखी एक डबा कमी केल्याने अवघे दोन सेकंड क्लासचे डबे लावून गाडी चालवली जात आहे. त्यामुळे ९० ऐवजी केवळ ६० प्रवासीच प्रवास करू शकतात.


माथेरान शहर काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अध्यक्ष मनोज खेडकर यांच्या सहीचे पत्रासोबत माथेरान रेल्वेचे स्टेशन मास्तर जी. एस. मीना यांची भेट घेऊन तत्काळ डब्यांची संख्या वाढवण्याची मागणी केली. या वेळी नगरसेवक शिवाजी शिंदे, महिला काँग्रेस अध्यक्षा वर्षा शिंदे, नागरी पत संस्थेचे सभापती हेमंत पवार, धनगर समाजाचे अध्यक्ष राकेश कोकले सामाजिक कार्यकर्ते नितीन शाह आदी उपस्थित होते.


माथेरानला वाहन बंदी आहे. टॅक्सी स्टँड गावापासून तीन किलोमीटर दूर असल्याने मिनी ट्रेनची शटल सेवा सर्वांना सुलभ आहे. लवकरच दिवाळी सीजन सुरू होत आहे. डब्यांची संख्या वाढली पाहिजे काँग्रेस पक्षाच्या मागणीची दाखल डीआरएम ऑफिसने घेतली असून मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी लवकरात लवकर नेरळ यार्डात डबे माथेरानला पाठवण्यात येतील, असे सांगितले.

Comments
Add Comment

​Sawantwadi : सावंतवाडी शहराला वादळाचा तडाखा

रामेश्वर प्लाझा इमारतीचे पत्रे उडाले पंचम खेमराज महाविद्यालयाच्या जुने इमारतीचे अतोनात नुकसान सावंतवाडी :

Eknath Shinde : 'पात्र लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत'

रायगड : बोरीचा माळ सारख्या छोट्या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे आता तुम्हाला रोज

Ratnagiri : चार वाहनांना धडक देऊन ट्रक कोसळला विहिरीत

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे हातखंबा येथे चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर

Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्गाचा नवा मार्ग निश्चित; कोकणातील 'या' ९ गावांतून सुसाट धावणार गाड्या!

मुंबई : राज्यातील प्रस्तावित 'शक्तीपीठ महामार्गा'बाबत (शेतकऱ्यांनी दर्शवलेला तीव्र विरोध लक्षात घेता, राज्य

Ratnagiri : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; भाविकांची मोठी गर्दी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त अत्यंत देखणी आणि मनमोहक

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या