तिघाडी सरकारने महाराष्ट्राच्या भवितव्याशी चालवलेला खेळ निंदनीय

मुंबई : मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. "कोरोनाचे निमित्त साधून या तिघाडी सरकारने महाराष्ट्राच्या भवितव्याशी जो खेळ चालवला आहे तो निंदनीय आहे" असे म्हणत जोरदार टीका केली आहे. तसेच "शिक्षणद्रोही सरकारला लवकर सुबुद्धी येवो आणि विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न सुटोत" अशी प्रार्थना देखील मनसेने देवीकडे केली आहे.


https://twitter.com/ThakareShalini/status/1448522151070343171

शालिनी ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केले आहे. "आज दीड वर्षांनी शाळा उघडतायत मात्र शाळा सुरू नसतानाही खाजगी शाळांनी पालकांकडून सर्रास फी घेऊन लूट माजवली. एमपीएससी आणि इतर महत्त्वांच्या परीक्षांचा सावळा गोंधळ तर अजूनही सुटला नाही, परिणामी सर्व विद्यार्थ्यांचं भविष्य अजूनही अंधारातच आहे. त्याची जबाबदारी हे सरकार कधी घेणार? कोरोनाचं निमित्त साधून या तिघाडी सरकारने महाराष्ट्राच्या भवितव्याशी जो खेळ चालवला आहे तो निंदनीय आहे. दरदिवशी वेगवेगळे मंत्री वेगवेगळे निर्णय घेऊन विद्यार्थी आणि पालक यांना अजूनच बुचकळ्यात पाडत आहेत" असे त्यांनी म्हटले आहे.


"आई, आज तुझ्या माध्यमातून या शिक्षणद्रोही सरकारला लवकर सुबुद्धी येवो आणि विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न सुटोत अशी प्रार्थना करते...



"आई माझी अशी..
हाकेला धाव ग..
शिक्षणाचा झाला आमच्या
पुरता खेळखंडोबा ग..
कोण काय निर्णय घेते
याचा ना कुणाला मेळ ग..
तूच आता हातात घे छडी
आणि दे यांना शिक्षा ग..""


असे शालिनी ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.


https://twitter.com/ThakareShalini/status/1448522169206521859
Comments
Add Comment

'उबाठा' गटाला पुन्हा खिंडार? निम्म्याहून अधिक खासदार शिवसेनेच्या वाटेवर

- कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच 'धमाका' होणार; एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यांनातर घडामोडींना वेग मुंबई :

महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) विधेयक २०२६ एकमताने मंजूर

मुंबई : राज्यातील पर्यावरण संरक्षण, आर्थिक शिस्त आणि औद्योगिक विकास यांचा समतोल साधण्याच्या दृष्टीने

‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा

नक्षलग्रस्त भागात सागवान तस्करांचा धुमाकूळ; वनमंत्र्यांकडून सखोल चौकशीचे आदेश

मुंबई : नक्षलग्रस्त भागातील मौल्यवान सागवान लाकडाची तस्करी करणार्‍या संघटित टोळ्यांना राजकीय पाठबळ मिळत आहे,

मालाडमध्ये प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनात घोटाळा- चौकशी समिती गठीत; अहवाल प्राप्त होईपर्यंत प्रकल्पाला स्थगिती

मुंबई : मालाड पूर्वमधील प्रकल्प बाधितांच्या (पीएपी) पुनर्वसनात घोटाळा झाल्याची बाब बुधवारी विधानसभेत चर्चेला

मुंबईतील जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनात त्रुटी ठेवणार नाही; मंत्री पंकजा मुंडेंनी विधान परिषदेत मांडली ठोस भूमिका

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या केईएम (KEM), नायर आणि कूपर या प्रमुख रुग्णालयांमधील जैववैद्यकीय कचऱ्याची