मजीप्राच्या जलकुंभाची वर्षभरापासून साफसफाईच नाही!

  42


राष्ट्रवादीचा आरोप




रवींद्र थोरात


बदलापूर : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून अंबरनाथ व बदलापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी उभारण्यात आलेल्या जलकुंभाची गेल्या वर्षभरापासून साफसफाई झालेली नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक सचिव हेमंत रुमणे यांनी केला आहे. जलकुंभाची साफसफाई न झाल्यास जलजन्य आजार वाढण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.


महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून अंबरनाथ व बदलापूर शहराला पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी या दोन्ही शहरात अनेक उंच जलकुंभ व भूस्तर जलकुंभ बांधण्यात आले आहेत. या जलकुंभाची नियमित सफाई न झाल्यास दूषित व अस्वच्छ पाणीपुरवठा होऊन नागरिकांना कावीळ वा तत्सम जलजन्य आजारांची लागण हाऊ शकते.


या पार्श्वभूमीवर या जलकुंभाची वर्षातून एकदा तरी आतून मशीन यंत्राद्वारे साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी रूमणे यांनी २०१९ मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. त्याची दखल घेऊन मजीप्राच्या अधिकाऱ्यांनी हायप्रेशर मशीनद्वारे जलकुंभाची आतून सफाई करण्यास सुरुवात केली होती. अशाप्रकारे बदलापूर शहरात ८ जलकुंभांची सफाई करण्यात आली होती. अंबरनाथ शहरातील जलकुंभांचीही अशाप्रकारे सफाई करण्यात येणार होती. मात्र, मजीप्राचे अंबरनाथ विभागाच्या तत्कालीन कार्यकारी अभियंत्यांनी अचानक हे काम बंद केले. त्यानंतर मजीप्राच्या डीएसआर मधूनही हे काम वगळण्यात आले. सुमारे वर्षभरापासून हे काम बंद असून पुन्हा डीएसआरमध्ये समावेश झाल्याशिवाय हे काम होणार नसल्याचे रुमणे यांचे म्हणणे आहे.


जलजन्य आजारांचा धोका लक्षात घेता नागरिकांना शुद्ध पाणी मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी इतर उपाययोजना करण्याबरोबरच जलकुंभाची साफसफाई महत्त्वाची आहे. जलकुंभाची नियमित सफाई करण्याबाबत आदेश देण्याची विनंती केली असल्याचेही रूमणे यांनी सांगितले.


वर्षातून एकदा जलकुंभ सफाई करायची असते. जलकुंभ सफाईच्या कामाचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो वरिष्ठ कार्यालयाला मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. - एम. एस. बसनगार (कार्यकारी अभियंता - मजीप्रा, अंबरनाथ विभाग)

Comments
Add Comment

मुंबईत बेस्ट बसेसची संख्या १० हजारांपर्यंत वाढवण्याची योजना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभागृहात माहिती

मुंबई : मुंबईच्या बेस्ट उपक्रमामध्ये भाडेतत्वावर ६,५५५ बसेस घेण्यासाठी विविध पुरवठादारांसोबत करार केला आहे.

Medical College : 'अहिल्यानगर शहरातच वैद्यकीय महाविद्यालय होणार'; मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

अहिल्यानगर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगर शहरातचं होणार असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं

Nitesh Rane : ‘मुंबईचा डीएनए हिंदूंचा, महानगरपालिकेत फक्त भगवे बसणार…’, नितेश राणे यांचा ठाम विश्वास

मुंबई : नितेश राणे यांच्या हस्ते ‘बोरीवली रो-रो जेट्टी (फेज १)’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भूमिपूजन आज सकाळी

आता वेळेत पूर्ण होणार मुंबई मेट्रोची कामे

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईमध्ये मेट्रो प्रकल्पांचा विस्तार झपाट्याने सुरू आहे. एमएमआरडीए हणजेच मुंबई महानगर

गोठवलेल्या बँक खात्यांतील पैसे खातेदारांना लवकर मिळणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबई (प्रतिनिधी) : सायबर गुन्हे नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प कार्यान्वित करण्यात

आरोग्य सांभाळा, डेंग्यूचा धोका वाढला!

मुंबई: पावसाळ्याच्या दिवसांत साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती वाढली असून राज्यात अनेक