आर्यन खान तुरुंगातच


२० ऑक्टोबरला जामीनावर निर्णय




मुंबई (प्रतिनिधी) : क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यन खान याच्या जामिनावर न्यायालयाने गुरूवारी निर्णय राखून ठेवला आहे. त्यामुळे आर्यन खानचा जामीन लांबला असून येत्या बुधवारी २० ऑक्टोबर रोजी आर्यन याच्या जामीन अर्जावर निर्णय सुनावण्यात येणार आहे. त्यामुळे आजही आर्यनला दिलासा मिळाला नसल्याचे चिन्ह आहे.


आर्यन आणि अरबाजच्या चौकशीतून ड्रग्ज प्रकरणातील मोठा कट उघड होऊ शकतो. त्यामुळे त्याला जामीन दिला जाऊ नये, असा युक्तिवाद ‘एनसीबी’चे वकिल अनिल सिंह यांनी केला. अनेक तासांच्या सुनावणी नंतरही आर्यन खानला जामीन मिळाला नाही. आता या प्रकरणाचा निकाल २० ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाईल. त्यामुळे आर्यनला तोपर्यंत तुरुंगात राहावे लागणार आहे. आर्यन खान सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यामुळे पुढील ६ दिवस त्याला तुरुंगात राहावे लागणार आहे. तर दुसरीकडे बॉलिवूडमधील अनेक कलाकार शाहरूख आणि आर्यनच्या पाठिंब्यासाठी पुढे आले आहेत.


दरम्यान, आर्यन खानसह पाच आरोपींना क्वारंटाईन बराकमधून काढून कॉमन सेलमध्ये पाठवण्यात आले आहे. आर्थर रोड कारागृहाचे अधीक्षक नितीन वायचल यांनी सांगितले की आर्यन आणि उर्वरित आरोपींचा कोविड अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना कॉमन सेलमध्ये पाठवण्यात आले आहे.


विशेष एनडीपीएस न्यायालयाने आर्यन खानच्या जामीन अर्जाविरोधात ७२ वर्षीय सामाजिक कार्यकर्त्याचा हस्तक्षेप अर्ज फेटाळला आहे. या हस्तक्षेप अर्जाला आर्यनच्या वतीने सतीश मानेशिंदे यांनी विरोध केला होता. ते म्हणाले की हा पब्लिसिटी स्टंट आहे आणि कोर्टाने बुधवारीच फिर्यादी आणि आरोपींची सुनावणी केली आहे. हस्तक्षेप अर्जामध्ये दावा करण्यात आला आहे की ड्रग्जचा संपूर्ण देशावर परिणाम होत आहे, त्यामुळे त्याची सुनावणी झाली पाहिजे.

Comments
Add Comment

रस्ते तसेच रेल्वे कन्व्हर्टची सफाई रिमोट कंट्रोल मशिन्सद्वारे

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने रस्ते आणि रेल्वे कल्व्हर्ट यांच्या सफाईसाठी रिमोट कंट्रोल स्वींग लोडर मशीनचा

BMC : मुंबईसाठी तब्बल १३,५०० मोठ्या आकाराच्या कचरा पेट्यांची खरेदी

सार्वजनिक कचरा पेट्यांची संख्या कमी करताना या ठेवणार कुठे? मुंबई : मुंबईतील मोठ्या आकाराच्या कचरा कुंड्या हटवून

Navi Mumbai: नवी मुंबईतील भोंदूची विकृती उघड; काळी जादू करण्यासाठी महिलांना विवस्त्र व्हायला सांगत...

नवी मुंबई: राज्यात सध्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. अशातच आता नवी मुंबईतून अशीच एक धक्कादायक

Ashok Kharat Case : भोंदूबाबा प्रकरणातील स्त्रिया मानसिक धक्क्यात; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे.....

मुंबई : नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता अधिक गंभीर वळण घेतले आहे, भोंदूबाबा सोबतचे

मिठी नदी, नालेसफाईच्या कामांबाबत गैरप्रकार झाल्यास थेट कारवाई; महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिला इशारा

मुंबई: नालेसफाईच्या संपूर्ण प्रक्रियेवर अभियंत्यांचे वैयक्तिक लक्ष असणे आवश्यक आहे. तसेच नालेसफाईच्या

महापौरांनी ओळखला भविष्यातील पाणी टंचाईचा धोका; सन २००९च्या धर्तीवर मुंबईतील सर्व विहिरी तपासा, तात्काळ वापरात आणा

मुंबई: भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी मुंबईतील सर्व सार्वजनिक, शासकीय तसेच खासगी विहिरी आणि कूपनलिकांची