आर्यन खान तुरुंगातच


२० ऑक्टोबरला जामीनावर निर्णय




मुंबई (प्रतिनिधी) : क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यन खान याच्या जामिनावर न्यायालयाने गुरूवारी निर्णय राखून ठेवला आहे. त्यामुळे आर्यन खानचा जामीन लांबला असून येत्या बुधवारी २० ऑक्टोबर रोजी आर्यन याच्या जामीन अर्जावर निर्णय सुनावण्यात येणार आहे. त्यामुळे आजही आर्यनला दिलासा मिळाला नसल्याचे चिन्ह आहे.


आर्यन आणि अरबाजच्या चौकशीतून ड्रग्ज प्रकरणातील मोठा कट उघड होऊ शकतो. त्यामुळे त्याला जामीन दिला जाऊ नये, असा युक्तिवाद ‘एनसीबी’चे वकिल अनिल सिंह यांनी केला. अनेक तासांच्या सुनावणी नंतरही आर्यन खानला जामीन मिळाला नाही. आता या प्रकरणाचा निकाल २० ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाईल. त्यामुळे आर्यनला तोपर्यंत तुरुंगात राहावे लागणार आहे. आर्यन खान सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यामुळे पुढील ६ दिवस त्याला तुरुंगात राहावे लागणार आहे. तर दुसरीकडे बॉलिवूडमधील अनेक कलाकार शाहरूख आणि आर्यनच्या पाठिंब्यासाठी पुढे आले आहेत.


दरम्यान, आर्यन खानसह पाच आरोपींना क्वारंटाईन बराकमधून काढून कॉमन सेलमध्ये पाठवण्यात आले आहे. आर्थर रोड कारागृहाचे अधीक्षक नितीन वायचल यांनी सांगितले की आर्यन आणि उर्वरित आरोपींचा कोविड अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना कॉमन सेलमध्ये पाठवण्यात आले आहे.


विशेष एनडीपीएस न्यायालयाने आर्यन खानच्या जामीन अर्जाविरोधात ७२ वर्षीय सामाजिक कार्यकर्त्याचा हस्तक्षेप अर्ज फेटाळला आहे. या हस्तक्षेप अर्जाला आर्यनच्या वतीने सतीश मानेशिंदे यांनी विरोध केला होता. ते म्हणाले की हा पब्लिसिटी स्टंट आहे आणि कोर्टाने बुधवारीच फिर्यादी आणि आरोपींची सुनावणी केली आहे. हस्तक्षेप अर्जामध्ये दावा करण्यात आला आहे की ड्रग्जचा संपूर्ण देशावर परिणाम होत आहे, त्यामुळे त्याची सुनावणी झाली पाहिजे.

Comments
Add Comment

आयएसएफ २०२५ अंतर्गत ‘वन इनोव्हेशन’ राष्ट्रीय स्पर्धेत अरजित मोरे विजेता

मुंबई  : महाराष्ट्रातील इयत्ता ८ वी चा विद्यार्थी अरजित अमोल मोरे यांची ‘वन इनोव्हेशन – टुवर्ड्स अ सेल्फ रिलायंट

जिगरबाज सैनिकांसाठी मनोरंजन मेजवानी

देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना सीमेवर जाऊन सांस्कृतिक 'सलामी ' मुंबई  : प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सीमेवर तैनात

मुंबईतील ९ विधानसभांमध्ये उबाठाचे 'शून्य' नगरसेवक

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष हा उबाठा ठरला असला तरी प्रत्यक्षात मुंबईतील ०९

विद्याविहार रेल्वे पूल येत्या ३१ मे २०२६ पर्यंत होणार पूर्ण, पूर्व दिशेकडील कामे २८ फेब्रुवारी पर्यंत पूर्ण होणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पूर्व उपनगरातील पूर्व व पश्चिम यांना जोडणारा विद्याविहार रेल्वे स्थानकावरील

सोशल मीडिया वापरासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना निर्बंध, फेसबुक-एक्सवर पोस्ट कर्मचाऱ्यांना महागात पडणार

मुंबई : राज्य शासनाचे कर्मचारी आपल्या वैयक्तिक सोशल मीडिया अकाऊंटवर गणवेशातील फोटो, कार्यालयाचे लोगो, पदनाम,

कोकणातील कोळीवाड्यांच्या जमिनी अधिकृत होणार!

सीमांकनासाठी समिती गठीत; तीन महिन्यांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई : कोकण किनारपट्टीवरील