आर्यन खान तुरुंगातच

  34


२० ऑक्टोबरला जामीनावर निर्णय




मुंबई (प्रतिनिधी) : क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यन खान याच्या जामिनावर न्यायालयाने गुरूवारी निर्णय राखून ठेवला आहे. त्यामुळे आर्यन खानचा जामीन लांबला असून येत्या बुधवारी २० ऑक्टोबर रोजी आर्यन याच्या जामीन अर्जावर निर्णय सुनावण्यात येणार आहे. त्यामुळे आजही आर्यनला दिलासा मिळाला नसल्याचे चिन्ह आहे.


आर्यन आणि अरबाजच्या चौकशीतून ड्रग्ज प्रकरणातील मोठा कट उघड होऊ शकतो. त्यामुळे त्याला जामीन दिला जाऊ नये, असा युक्तिवाद ‘एनसीबी’चे वकिल अनिल सिंह यांनी केला. अनेक तासांच्या सुनावणी नंतरही आर्यन खानला जामीन मिळाला नाही. आता या प्रकरणाचा निकाल २० ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाईल. त्यामुळे आर्यनला तोपर्यंत तुरुंगात राहावे लागणार आहे. आर्यन खान सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यामुळे पुढील ६ दिवस त्याला तुरुंगात राहावे लागणार आहे. तर दुसरीकडे बॉलिवूडमधील अनेक कलाकार शाहरूख आणि आर्यनच्या पाठिंब्यासाठी पुढे आले आहेत.


दरम्यान, आर्यन खानसह पाच आरोपींना क्वारंटाईन बराकमधून काढून कॉमन सेलमध्ये पाठवण्यात आले आहे. आर्थर रोड कारागृहाचे अधीक्षक नितीन वायचल यांनी सांगितले की आर्यन आणि उर्वरित आरोपींचा कोविड अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना कॉमन सेलमध्ये पाठवण्यात आले आहे.


विशेष एनडीपीएस न्यायालयाने आर्यन खानच्या जामीन अर्जाविरोधात ७२ वर्षीय सामाजिक कार्यकर्त्याचा हस्तक्षेप अर्ज फेटाळला आहे. या हस्तक्षेप अर्जाला आर्यनच्या वतीने सतीश मानेशिंदे यांनी विरोध केला होता. ते म्हणाले की हा पब्लिसिटी स्टंट आहे आणि कोर्टाने बुधवारीच फिर्यादी आणि आरोपींची सुनावणी केली आहे. हस्तक्षेप अर्जामध्ये दावा करण्यात आला आहे की ड्रग्जचा संपूर्ण देशावर परिणाम होत आहे, त्यामुळे त्याची सुनावणी झाली पाहिजे.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.