साथीच्या आजारांचा धोका वाढतोय!


ऑक्टोबरच्या १० दिवसांत चिकनगुनीयाचे १५ रुग्ण




सीमा दाते


मुंबई : मुंबई महापालिका कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहून आधीच चिंतेत आहे. त्यातच आता मुंबईत मलेरिया, डेंग्यू पाठोपाठ चिकनगुनीया फोफावताना पाहायला मिळत आहे.


गेल्या दोन वर्षांत चिकनगुनीयाच्या एकाही रुग्णाची मुंबईत नोंद झाली नव्हती; मात्र यावर्षी केवळ ऑक्टोबरच्या १० दिवसांत १५ रुग्ण आढळले आहेत. तर जानेवारीपासून आतापर्यंत ३० रुग्ण आढळले आहेत.


कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता कमी असली तरी कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे महापालिकेची डोकेदुखी वाढलेली असताना आता मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनीया यासारख्या साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या दोन वर्षांत चिकनगुनीयाचा एकही रुग्ण मुंबईत नव्हता. असे असताना यावर्षी २०२१ मध्ये ऑक्टोबरच्या केवळ १० दिवसांत १५ चिकनगुनीयाच्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण देखील केवळ दहा दिवसांत जास्त आहेत. मलेरियाचे रुग्ण ऑक्टोबरच्या दहा दिवसांत १६९ तर डेंग्यूचे ९७ रुग्ण आहेत.


दरवर्षी सप्टेंबरनंतर मलेरिया आणि डेंग्यूच्या आजारात वाढ होताना पहायला मिळते. त्याच प्रमाणे यंदाही तशीच रुग्ण संख्या आहे. मात्र दोन वर्षांपासून मुंबईतून हद्दपार झालेला चिकनगुनीया मात्र यावर्षी डोके वर काढत आहे. त्यामुळे पुन्हा मुंबईत साथीच्या आजाराबाबत भीतीचे वातावरण आहे. दरम्यान गेल्यावर्षी २०२० मध्ये मलेरियाचे ५००७ रुग्ण आढळले होते. मात्र यावर्षी केवळ दहा महिन्यांत ४१७२ रुग्ण आढळले आहेत. गेल्यावर्षी २०२० मध्ये १२९ डेंग्यूचे रुग्ण आढळले होते. तर यावर्षी १० महिन्यांत ५७३ रुग्ण आढळले आहेत.


दरम्यान मुंबई महापालिकेने साथीच्या आजारांसंदर्भात पूर्वनियोजन केले असले तरी मुंबईकरांना स्वच्छता पाळा, पावसाचे पाणी साठू देऊ नका, जिथे डास होतील ती जागा साफ ठेवा असे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः चिकनगुनीया पासून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment

राज्यातील चेक पोस्ट बंद करणार, मंत्री प्रताप सरनाईकांनी दिले आश्वासन

मुंबई : चेक पोस्ट संदर्भात लोकप्रतिनिधी तसेच विविध संस्थांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या विषयाची गंभीर दखल

महाराष्ट्रात गॅस, पेट्रोल-डिझेलचा तुटवडा नाही 

 इराण-इस्राईल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विशेष समित्यांची स्थापना; रिफायनरींकडून उत्पादन वाढवले मुंबई : इराण

महाराष्ट्रात १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांची काळजी घ्यावी; पाऊस आणि वाऱ्यापासून पिकांना सुरक्षित ठेवावे मुंबई :

ई-रिक्षां व ई-बाईकसाठीही परमिट (परवाना ) बंधनकारक करण्याचा निर्णय -- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सींसाठी नवीन परमिट देण्याची प्रक्रिया गेल्या दोन दिवसांपासून तात्पुरती स्थगित

Railway LPG Shortage : इंधन संकटाचा रेल्वे खानपान सेवेला फटका; वडापाव-समोसे मेन्यूमधून गायब होणार?

मुंबई : एलपीजीच्या सध्याच्या कमतरतेचा परिणाम रेल्वे स्थानकांमधील रेस्टॉरंट्सवर होऊ लागला आहे, अनेक

येत्या ३१ मार्च २०२६ पूर्वी पाण्याचे बिल न भरल्यास पाण्याची लाइन कापणार

मुंबई: महानगरपालिकेमार्फत नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यात येत असून सर्व जलजोडणीधारकांनी प्रलंबित