साथीच्या आजारांचा धोका वाढतोय!

  25


ऑक्टोबरच्या १० दिवसांत चिकनगुनीयाचे १५ रुग्ण




सीमा दाते


मुंबई : मुंबई महापालिका कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहून आधीच चिंतेत आहे. त्यातच आता मुंबईत मलेरिया, डेंग्यू पाठोपाठ चिकनगुनीया फोफावताना पाहायला मिळत आहे.


गेल्या दोन वर्षांत चिकनगुनीयाच्या एकाही रुग्णाची मुंबईत नोंद झाली नव्हती; मात्र यावर्षी केवळ ऑक्टोबरच्या १० दिवसांत १५ रुग्ण आढळले आहेत. तर जानेवारीपासून आतापर्यंत ३० रुग्ण आढळले आहेत.


कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता कमी असली तरी कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे महापालिकेची डोकेदुखी वाढलेली असताना आता मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनीया यासारख्या साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या दोन वर्षांत चिकनगुनीयाचा एकही रुग्ण मुंबईत नव्हता. असे असताना यावर्षी २०२१ मध्ये ऑक्टोबरच्या केवळ १० दिवसांत १५ चिकनगुनीयाच्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण देखील केवळ दहा दिवसांत जास्त आहेत. मलेरियाचे रुग्ण ऑक्टोबरच्या दहा दिवसांत १६९ तर डेंग्यूचे ९७ रुग्ण आहेत.


दरवर्षी सप्टेंबरनंतर मलेरिया आणि डेंग्यूच्या आजारात वाढ होताना पहायला मिळते. त्याच प्रमाणे यंदाही तशीच रुग्ण संख्या आहे. मात्र दोन वर्षांपासून मुंबईतून हद्दपार झालेला चिकनगुनीया मात्र यावर्षी डोके वर काढत आहे. त्यामुळे पुन्हा मुंबईत साथीच्या आजाराबाबत भीतीचे वातावरण आहे. दरम्यान गेल्यावर्षी २०२० मध्ये मलेरियाचे ५००७ रुग्ण आढळले होते. मात्र यावर्षी केवळ दहा महिन्यांत ४१७२ रुग्ण आढळले आहेत. गेल्यावर्षी २०२० मध्ये १२९ डेंग्यूचे रुग्ण आढळले होते. तर यावर्षी १० महिन्यांत ५७३ रुग्ण आढळले आहेत.


दरम्यान मुंबई महापालिकेने साथीच्या आजारांसंदर्भात पूर्वनियोजन केले असले तरी मुंबईकरांना स्वच्छता पाळा, पावसाचे पाणी साठू देऊ नका, जिथे डास होतील ती जागा साफ ठेवा असे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः चिकनगुनीया पासून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment

डॉक्टर तयार करणार की कंपाऊंडर? विधानसभेत निलेश राणेंचा हल्लाबोल!

सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजची दयनीय स्थिती, आमदार निलेश राणेंचे तीव्र सवाल मंत्री मुश्रीफ यांनी दिले स्वत: पाहणी

जयंत पाटील भाजपाच्या वाटेवर? मंत्री आशिष शेलारांशी भेट घेतल्याने राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते

'मैदानात उतरण्याआधीच रडणे सोडा, हिंम्मत असेल तर खऱ्या मर्दांसारखे निवडणुकीच्या रिंगणात या'

मंत्री आशिष शेलार यांचे उद्धव ठाकरेंना थेट आव्हान मुंबई: "खऱ्या मर्दांसारखे निवडणुकीच्या रिंगणात या, मैदानात

पेंग्विनच्या देखभालीवर २५ कोटी खर्च

मुंबई (प्रतिनिधी) : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहायलातील (राणीची बाग)

गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता भुयारी बोगद्याचा मार्ग मोकळा

मुंबई: मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा

मातोश्रीकडे डुप्लिकेट शिवसेना

मुंबई : खरी शिवसेना आता एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे डुप्लिकेट शिवसेना आहे. त्यांनी अडीच