गांधीजींच्या सल्ल्यानंतरच सावरकरांची इंग्रजांपुढे दया याचिका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी महात्मा गांधीं यांच्या सांगण्यावरूनच इंग्रजांपुढे दया याचिका दाखल केली होती, असा दावा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी एका जाहीर कार्यक्रमात बोलताना केला.


एका वेगळ्या विचारधारेनं प्रभावित गट वीर सावरकर यांच्या आयुष्य आणि विचारधारेशी अपरिचित आहे. त्यांना याची योग्य समज नाही आणि त्यामुळेच ते प्रश्न विचारत राहतात. विचारधारेच्या चष्म्यातून पाहिलं तर वीर सावरकर यांच्या योगदानाची उपेक्षा करणं आणि त्यांना अपमानित करणं क्षमा योग्य आणि न्यायसंगत नाही, असंही राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. उदय माहूरकर आणि चिरायु पंडित लिखित 'वीर सावरकर हू कूड हॅव प्रीव्हेन्टेड पार्टिशन' या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसेच सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते.


विनायक दामोदर सावरकर यांनी अंदमानच्या तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा भोगताना ब्रिटिशांकडे दया याचिका दाखल केली होती, अशी टीका विरोधकांकडून केली जाते. मात्र, सावरकरांच्या विरोधात खोट्या गोष्टी पसरवण्यात आल्या. ज्या प्रकारे आम्ही शांततेने स्वातंत्र्याची चळवळ चालवत आहोत, सावरकर तेच करतील' अशी गांधींनी म्हटल्याचंही राजनाथ सिंह म्हणाले.

Comments
Add Comment

बिहारमध्य राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या