नेरुळ, सिवूड रेल्वे स्थानक परिसरात अवैध फेरीवाल्यांचा उच्छाद

नवी मुंबई (प्रतिनिधी) : नेरूळ व सिवूड रेल्वे स्थानक परिसरात जुन्या व नव्या अनधिकृत फेरीवाल्यांचा उच्छाद दिवसेंदिवस वाढला असून नागरिकांना नाहक त्रासाचा सामना करावा लागत आहे.


विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच आमदार गणेश नाईक यांनी मनपा आयुक्तांना इशारा दिला असतानाही फेरीवाल्यांचा प्रश्न निकाली निघत नाही. म्हणून या दोन्हीही रेल्वेस्थानकाच्या शेजारी नव्याने अवैधपणे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारावा, अशी मागणी भाजप महिला मोर्च्याच्या सरचिटणीस अॅड. मंगल घरत यांनी आयुक्तांना निवेदन देऊन केली आहे.


नेरूळ व सिवूड येथील रेल्वेस्थानक परिसरात गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत फेरीवाल्यांचे प्रमाण खूपच वाढले आहे. रात्रीच्या वेळी तर नेरूळ रेल्वे स्थानक परिसरात व आवारात तर अनेक अवैध धंदे बिनदिक्कतपणे सुरू असतात. अवैध फेरीवाल्यांच्या दहशतीला मागे ठाणे येथील घटनेमुळे नागरिक घाबरूनच असतात. यामुळे नागरिकांच्या मनात त्यांच्याविषयी भीती असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.


सिवूड रेल्वे स्थानकाशेजारी असणाऱ्या डी मार्ट समोर अनेक फेरीवाले बस्तान ठोकतात. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न नित्याचाच झाला आहे. रहदारीलादेखील अडथळा निर्माण होत आहे. या समस्येमुळे येथील नागरिक त्रस्त झाले असून या प्रकरणी गांभीर्याने दखल घेत ताबडतोब फेरीवाल्यांची वर्गवारी करून अनाधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करावी, अशीही विनंती निवेदनातून करण्यात आली आहे.


नेरूळ व सिवूड रेल्वे स्थानक परिसरात काही फेरीवाले पूर्वपार काळापासून व्यवसाय करत आहेत. त्यांना त्यांचा कायदेशीर अधिकार मिळणे गरजेचे आहे. म्हणून नवीन व जुने फेरीवाले अशी वर्गवारी करून नव्या अवैध फेरीवाल्यांवर कारवाई करावी. - मंगल घरत, सरचिटणीस, महिला मोर्चा, भाजप, नवी मुंबई

Comments
Add Comment

Watermelon Death Case : कलिंगड खाल्लं अन् एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू; दुकानदारानेच सांगितलं सत्य

मुंबई : बिर्याणी त्यानंतर थंडावा मिळावा म्हणून खाल्लेलं कलिंगड आणि थेट मृत्यू किती भयंकर आहे ना हे, मुंबईतील

Bacchu Kadu, Eknath Shinde : विधान परिषद दिली तर शिंदेंचा पाईक म्हणून काम करेन - बच्चू कडू

मुंबई : "उमेदवारी अर्जासोबत जोडायची कागदपत्रे माझ्या बॅगेतच आहेत. जर शिवसेनेने सन्मानाने उमेदवारी दिली, तर

Santosh Deshmukh Massajog Sarpanch Election Result : बीड - मस्साजोगच्या निवडणुकीचा निकाल झाला जाहीर

बीड : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मस्साजोगच्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा निकाल आज अखेर जाहीर झाला, अत्यंत

BMC News : मुंबईत १७४ धोकादायक इमारती, ७२ इमारती केल्या रिक्त

रेल्वे लगतच्या इमारतींवरही विशेष लक्ष मुंबई : मुंबईत एकूण १७४ इमारती या अति धोकादायक जागा झाल्या असून त्यात १४१

BMC News : मुंबईतील १७४० किलोमीटर रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण

मुंबईतील ७५ टक्क्यांपेक्षा अधिक झालेले रस्ते ३१ मेपर्यंत पूर्ण करणार मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या

Water Cut In Mumbai : मुंबईत येत्या १५ मे पासून दहा टक्के पाणीकपात

महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी केले घोषणा अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबणीवर, महापालिकेचे १७