फळेगावात नवरात्रीत घुमतो टाळ मृदूंगांचा नाद



कुणाल म्हात्रे


कल्याण : नवरात्र उत्सव म्हटला की, सर्वत्र डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाईची पावलं. दांडियाच्या रासक्रीडेत रममान होऊन तल्लीन झालेली जनता असे चित्र सर्वत्र पाहावयास मिळते. परंतु कल्याण तालुक्यातील फळेगावात जरिमरी मित्रमंडळाच्या नवरात्र उत्सवात गेल्या २८ वर्षांपासून घुमतोय फक्त टाळ मृदंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष.


नुकतीच घटस्थापना झाली असून, नऊ दिवस नवरात्र उत्सवाची धामधूम सर्व भारतभर सुरू रहाणार आहे. डीजेच्या तालावर ठेका धरून नाचणाऱ्या तरुणाईसह, लहानांपासून अबाल वृद्धांपासून सर्वच गरब्याच्या ठेक्यावर ताल धरत नाचताना दिसून येतात; परंतु कल्याण तालुक्यातील फळेगावात मात्र गेल्या २८ वर्षांपासून वेगळेच चित्र पाहायला मिळते. येथील जरिमरी मित्रमंडळात नवरात्र उत्सवात मात्र दांडिया ऐवजी टाळ मृदंगाचा आवाज घुमत असून हरिनामाचा जयघोष येथे सुरू आहे.


येथे रोज भजन, कीर्तन, हरिपाठ, प्रवचन अशा प्रकारचे विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. यंदा देखील त्याच उत्साहात हरिनामाचा गजर सुरू झाला आहे. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार व व्याख्यानकारांचे कार्यक्रम नऊ दिवस या ठिकाणी संपन्न होत असतात. रोज अनेक सामाजिक, राजकीय व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर आवर्जून या ठिकाणी भेट देत असतात. कल्याण तालुक्यातील नवरात्र उत्सवात हरिनामाचा जयघोष करणारे जरीमरी मित्र मंडळ, फळेगाव म्हणून जिल्हात ओळखले जात आहे.


या मंडळाची एक विशेष बाब प्रकर्षाने दिसून येते की, यांचे सर्व कार्यकर्ते हे तरुण आहेत. असे असून देखील या ठिकाणी दांडियाऐवजी धार्मिक कार्यक्रम राबवित आहेत. महाराष्ट्रातील नामांवत कीर्तनकारांची कीर्तने व प्रवचने या ठिकाणी रोज होत असतात. यंदा देखील फळेगावातील नवरात्र उत्सवात नऊ दिवस टाळ-मृदंगाचा नाद घुमणार असून हरिनामाचा जयघोष सुरू आहे.


आम्हाला आमच्या तरुण मुलांचा अभिमान आहे. गेल्या २८ वर्षांपासून आमची मुलं हा कार्यक्रम अविरतपणे राबवित आहेत. अशाच प्रकारे हा कार्यक्रम अखंड तेवत राहणार आहे. आम्ही देखील त्यांना मोठ्या प्रमाणात सहकार्य करत आहोत. असे मत मंडळाचे जेष्ठ सल्लागार कमलाकर महाराज व कृष्णा महाराज जाधव यांनी व्यक्त केले.


 


 

Comments
Add Comment

BMC : मुंबई महापालिका आयुक्त भिडे यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांची घेतली काळजी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : उष्माघात, निर्जलीकरण (डिहायड्रेशन) आणि उष्णतेमुळे होणाऱ्या इतर आरोग्य समस्यांपासून

Mumbai Fire Brigade : मुंबईत वाढत्या उन्हामुळे आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ, अग्निशमन दलाने केले दक्षतेचे आवाहन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वाढत्या तापमानामुळे घरांमध्ये, कार्यालयांमध्ये तसेच

CM Student Science Wari : 'मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी' उपक्रमाला शासनाची मान्यता

मुंबई : ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ उपक्रमाअंतर्गत राज्यातील विज्ञान प्रदर्शनांमध्ये उत्कृष्ट

Gymkhana : राज्यातील जिमखान्यांच्या भाडेपट्ट्याबाबत लवकरच नवीन धोरण

मुंबई : मुंबई शहरासह संपूर्ण राज्यातील शासकीय जमिनींवर उभारण्यात आलेल्या जिमखान्यांचे भाडेपट्टे संपुष्टात

मुंबई वॉटर मेट्रोच्या आराखड्याला गती ,मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा

काल्हेर, वाशी, गेट वे ऑफ इंडिया आणि नवी मुंबई विमानतळ स्थानकांचा समावेश मुंबई : मुंबईकरांना गर्दी आणि वाहतूक

BMCT : बीएमसीटीमध्ये ११३ स्थानिक सुरक्षारक्षकांना कामावरून कमी; विधानसभा उपाध्यक्षांनी मागविला अहवाल

मुंबई : भारत मुंबई कंटेनर टर्मिनल (बीएमसीटी) येथे कार्यरत असलेल्या स्थानिक प्रकल्पग्रस्त ११३ सुरक्षारक्षक