ठाण्यात शिवसैनिकांची रिक्षाचालकांना मारहाण

ठाणे : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराच्या निषेधार्थ आज महाविकासआघाडीकडून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. हा बंद यशस्वी करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही प्रमुख पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर देखील उतरल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनी स्वतःहून दुकाने बंद ठेवली. दरम्यान, ठाणे शहरात बंद दरम्यान रिक्षा चालवणाऱ्या रिक्षाचालकांना शिवसैनिकांकडून रस्त्यावरच मारहाण करण्यात आल्याचाही प्रकार समोर आला आहे.


ठाण्यामध्ये बंद पाळण्यासाठी शिवसैनिकांची एकप्रकारे दादागिरी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे रिक्षाचालकांना मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांमध्ये उपमहापौरांचे पती पवन कदम यांचा देखील सहभाग दिसून आला. महाराष्ट्र बंद दरम्यान रिक्षा बंद ठेवण्यासाठी शिवसैनिकांनी रस्त्यावर उतर रिक्षाचालकांना दमदाटी करत, मारहाण केल्याचे दिसून आले.


महाराष्ट्र बंद असल्याने टीएमटी बससेवा बंद आहे, परिणामी नागरिकांना इच्छित स्थळी पोहचण्यासाठी रिक्षाचा वापर करावा लागत आहे. परंतु, शिवसैनिकांच्या या मारहाणीमुळे रिक्षाचालकांमध्येही दहशतीचे वातावरण पहायला मिळत आहे.


ठाण्यामधील जांभळीनाका परिसरात हा प्रकार घडला. या ठिकाणी अनेक शिवसैनिक काठीने रस्त्यावर चालणाऱ्या रिक्षांमधील रिक्षाचालकांना मारहाण करत होते व रिक्षा बंद करा, असे धमकावत होते. याशिवाय काही जणांच्या टोळक्याने शहरात फिरुन जी दुकानं उघडी होती ती बंद करण्यासाठी दमदाटी करण्यात आल्याचेही समोर आले आहे. अनेक दुकानांमध्ये शिवसैनिक घुसले होते व दुकान बंद करण्यास भाग पाडले. एकुणच ठाण्यामध्ये एक दहशतीचे वातावरण निर्माण करून हा बंद पाळण्यास भाग पाडला जात असल्याचे निदर्शनास आले. शिवसैनिकांच्या या कृतीचा अनेकांनी तीव्र निषेध नोंदवला आहे.

Comments
Add Comment

वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात मुंबई पुष्पोत्सवाचा शुभारंभ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई पुष्पोत्सवाप्रमाणेच येत्या काळात पूर्व आणि पश्चिम उपनगरांतही पुष्पोत्सव सुरू

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला दिला पाठिंबा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेव नगरसेवक निवडून आला असून या नगरसेवकानेही आता

राज्यातील शेतजमिनींच्या पोटहिश्शांची आता मोजणी

प्रत्येक भूखंडाला मिळणार भू आधार क्रमांक ७/१२ आणि नकाशांचा मेळ बसणार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा

"मुंबईच्या सुवर्णकाळाची सुरुवात...", मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी, ६ फेब्रुवारी २०२६

उत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : “बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील, असे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग

वांद्रे–वरळी सी लिंक आणि कोस्टल रोडवर हेलिपॅड उभारा

मंत्री आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई : पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस