बळीराजाचे कष्ट पाण्यात; परतीच्या पावसाचा धुमाकूळ

वाडा (वार्ताहर) : वाडा तालुक्यात चार पाच दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने पिकांना मोठा दणका बसला आहे. हस्त नक्षत्रातील पाऊस मेघ गजनासह पडत असल्याने कापणीला आलेले भातपीक पावसाच्या तडाख्याने जमीनदोस्त झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे कष्टाचे पीक पाण्यात गेल्याने बळीराजाचा सुखाचा घास हिरावला आहे.


पावसामुळे झोपलेल्या भातशेतीकडे पाहून शेतकऱ्यांना मात्र गहिवरून येत आहे. त्यामुळे या भाताची कापणी करावी कशी? असा प्रश्न तालुक्यातील शेतकऱ्यांना पडला आहे. हाती आलेले पीक पावसाने हिरावून घेतल्याने वषर्भर मेहनत करून भरघोस आलेले भाताचे पीक पावसामुळे वाया जात असल्याने शेती पीकवावी की नाही. असा प्रश्न आता शेतकरी उपस्थित करू लागला आहे. कापणीला आलेले भात जमीदोस्त झाल्याने शेतकरी धास्तावला आहे. मजुरीच्या वाढत्या दरामूळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.


गेल्या दोन वर्षांप्रमाणेच या वर्षीही पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांची भात कापणी लवकरात लवकर करण्याकडे कल आहे. पण मजूर मिळेनासे झाले असून उपलब्ध असलेल्यांचा मजूरीचा भावही चांगलाच वधारला असल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. पावसाचा वाढलेला धोका पाहता मजूरी वाढीसाठी अडून बसलेल्या मजुरांना विनंत्या करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

Comments
Add Comment

म्हाडाच्या घरांचे दर १० टक्क्यांनी कमी होणार

म्हाडाच्या घरांचे दर १० टक्क्यांनी कमी होणार म्हाडाच्या घरांची सोडत जाहीर होताच, त्याच्या किंमती जास्त

दर घसरल्याने दसरा-दिवाळीत सुक्यामेव्याची खरेदी सर्वसामान्यांना शक्य!

दर घसरल्याने दसरा-दिवाळीत सुक्यामेव्याची खरेदी सर्वसामान्यांना शक्य! बदाम, पिस्ता, खजूर प्रतिकिलो ४० ते १००

GST: आजपासून तुमचे किती पैसै वाचणार? दररोज लागणाऱ्या या वस्तू झाल्या स्वस्त...

मुंबई: आजपासून देशभरात अनेक दैनंदिन वापरातील वस्तू स्वस्त झाल्या आहेत. केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन

Navratri 2025 : आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ,जाणून घ्या नवरात्र व्रताचा इतिहास, महत्त्व

मुंबई: सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके ।शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते ।। अर्थ : सर्व

दसरा-दिवाळीत सुक्यामेव्याची खरेदी सर्वसामान्यांना शक्य!

बदाम, पिस्ता, खजूर प्रतिकिलो ४० ते १०० रुपयांनी स्वस्त मुंबई (प्रतिनिधी) : खजूर, बदाम, पिस्ता हे खाण श्रीमंतीचे

मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली

सातही धरणांमध्ये वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईला पाणीपुरवठा करणारी सातही धरणे भरल्याने