नाशिक: राज्यात सगळीकडेच गणपती विसर्जनाचा(ganpati visarjan) उत्साह पाहायला आहे. मात्र त्यातच नाशिकमध्ये या सोहळ्याला गालबोट लावणारी घटना घडली आहे. गणपती विसर्जन करताना दोन जण बुडाल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहहे. नाशिकच्या गोदावरी नदीत विसर्जनासाठी गेलेले नदीच्या पाण्यात बुडाले. अखेरच्या दिवशी नाशिकमध्ये या गणपती उत्साहाला गालबोट लागले.
नाशिकच्या गोदावरी नदीत दोघे जण बुडाले तर वालदेवी धरणात तीन जण बुडाले. या धरणात बुडालेल्या व्यक्तींपैकी दोन महाविद्यालयीन तरूण तर एक विवाहित तरूणाचा समावेश आहे. गणपती विसर्जन करताना बुडालेल्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशनही युद्ध पातळीवर सुरू आहे.
प्राथमिक माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यात गोदावरील नदीत बुडालेल्या तरुणांबद्दल कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. तर वालदेवी धरणात विसर्जन करताना तीन जण बुडाले. या सर्व बुडालेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
गणपती विसर्जनासाठी गेलेले ४ जण उल्हास नदीत बुडाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. रायगडमध्ये कर्जत येथे उल्हास नदीत चार गणेशभक्त विसर्जनाला गेले होते. यावेळेस पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज आला नाही. त्यामुळे चारजण वाहून गेले.
ऐन निवडणुकीच्या काळात राऊतांना 'ते' वक्तव्य चांगलंच भोवणार मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत…
बुलढाणा बस दुर्घटनेची पुनरावृत्ती होता होता वाचली! बुलढाणा : गतवर्षी जून महिन्यात बुलढाणा येथे एक…
कालच्या राड्याप्रकरणी मिहिर कोटेचा यांचा मुंबईकरांना सवाल मविआच्या २५-३० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल; ५ जण पोलिसांच्या…
हसन मुश्रीफांनी घटनेची दखल घेत तातडीने आर्थिक मदत करण्याच्या दिल्या सूचना कोल्हापूर : कोल्हापुरातून (Kolhapur)…
कारण सांगताच घरचेही अवाक नवी दिल्ली : 'तारक मेहता का अलटा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतून…
मुंबई: लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२४मधील(ipl 2024) ६७व्या सामन्यात हरवले. लखनऊने पहिल्यांदा फलंदाजी…