गगनचुंबी इमारतींमध्ये आगीच्या १५६८ घटना

Share

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील गगनचुंबी इमारतींत तब्बल १५६८ आगीच्या घटना घडल्याची माहिती माहिती अधिकारातून समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद यांनी २००८ ते २०१८ दरम्यान लागलेल्या आगीच्या घटनेची माहिती मागवली होती. त्यानुसार दहा वर्षांत मुंबईत तब्बल ४८,४३४ आगीच्या घटना घडल्याची माहिती शकील अहमद शेख यांना मुंबई अग्निशमन दलाने दिली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई अग्निशमन दलाकडे २००८ पासून २०१८ पर्यंत मुंबईत किती आगीच्या घटना घडल्या आहेत? आणि किती गगनचुंबी इमारतींना आग लागली? याबाबत माहिती मागवली होती.

या दरम्यान ४८,४३४ आगीच्या घटना घडल्या असून असून उंच इमारतीत १५६८ घटना घडल्या असल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. तसेच ८७३७ रहिवासी इमारतींत आग लागल्या आहेत. तसेच ३८३३ व्यावसायिक इमारतींत आग लागली आहे आणि ३१५१ झोपडपट्ट्यांमध्ये आग लागली आहे.

सर्वात जास्त तब्बल ३२५१६ घटनेत शॉर्टसर्किटमुळे आग लागली आहे. १११६ घटनांमध्ये गॅस सिलिंडर लिकेजमुळे आग लागली आहे. ११,८८९ घटनांमध्ये अन्य कारणांमुळे आग लागली आहे. एकूण ६०९ लोकांचा आगीमुळे मृत्यू झाला आहे. त्यात २१२ पुरुष व २१२ स्त्री आणि २९ मुलांचा समावेश आहे.

तसेच आगीच्या घटनेत ८९,०४,८६,१०२ रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. तर २०२० मध्ये एकूण ३८४१ आगीच्या घटना घडल्या आहेत, यात ३३ जणांचा मृत्यू आणि १०० जण जखमी झाले आहेत.

परिमंडळ ५ च्या हद्दीत १२७३ आगीच्या घटना

सर्वात जास्त गगनचुंबी इमारतीत परिमंडळ ३ या हद्दीत एकूण ४९६ आगीच्या घटना घडल्या आहे. तसेच सर्वात जास्त रहिवासी इमारतीत परिमंडळ – ६ या हद्दीत १८३५ इतक्या आगीच्या घटना घडल्या आहेत. तसेच सर्वात जास्त व्यावसायिक इमारतीत परिमंडळ १ च्या हद्दीत ९८७ इतक्या आगीच्या घटना घडल्या आहे. तसेच सर्वात जास्त झोपड्यांत परिमंडळ ५च्या हद्दीत १२७३ इतक्या आगीच्या घटना घडल्या आहेत.

Recent Posts

‘आरटीई’अंतर्गत शाळा प्रवेशाची प्रक्रिया मुंबईत सुरू

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…

4 hours ago

मलाच मुख्यमंत्री बनवा अन्यथा मातोश्रीतले बिंग फोडेन!

संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…

5 hours ago

Lok Sabha Election : राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी

दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…

6 hours ago

Cloudburst : अरे बाप रे! मे महिन्यात इतका पाऊस कसा झाला? हवामान विभागालाही पडला प्रश्न

चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…

6 hours ago

काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी

काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…

6 hours ago

पतंजलीच्या उत्पादनाचा दर्जा निकृष्ट! सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल, तिघांना तुरुंगवास

नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…

7 hours ago