Saturday, May 18, 2024
Homeताज्या घडामोडीभीषण रस्ता अपघातात 15 जणांचा मृत्यू

भीषण रस्ता अपघातात 15 जणांचा मृत्यू

रांची : झारखंडच्या पाकूर जिल्ह्यात आज, बुधवारी सकाळी बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण रस्ता अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. आम्रपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पडेर कोला गावाजवळ हा अपघात झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लिट्टीपारा-आम्रापाडा मुख्य रस्त्यावर पडेर कोलाजवळ एक खाजगी बस आणि सिलेंडरने भरलेल्या ट्रकची समोरा समोर धडक झाली. अनियंत्रित ट्रक बसवर जोरात आदळला. ही धडक इतकी जोरदार होती की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. मृतांमध्ये बहुतांश जण हे बसमध्ये प्रवास करत होते. मोठा आवाज ऐकून आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळ गाठून पोलिसांना माहिती दिली. या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे.

अपघातग्रस्त प्रवाशांची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि स्थानिक लोकांच्या मदतीने मदत आणि बचाव कार्य सुरू केले. अपघातातील मृतांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहे.

ही बस साहिबगंजहून दुमकाकडे जात होती. पाकूरचे एसपी एचपी जनार्दन यांनी सांगितले की, आतापर्यंत 15 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बसमधील लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. ही धडक एवढी जोरदार होती की दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला. बसमधून बरेच लोक रस्त्यावर पडले किंवा जखमी झाले, तर बरेच लोक आत अडकले. जखमी आणि मृतांना बसमधून बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -