students : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनो, जरा लक्ष द्या!

Share

औरंगाबाद (प्रतिनिधी) : दहावी आणि बारावीच्या परिक्षेतील नियमात काही बदल करण्यात आले असून यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी होम सेंटर असणार नाही. तसेच कोरोनामुळे मागच्या वर्षीच्या दिलेला वाढीव वेळही रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांचा (students) वेळेच्या आतच पेपर लिहावा लागणार आहे.

कोरोना काळात विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना होम सेंटर आणि पेपर लिहिण्यासाठी वाढीव वेळ दिला होता. ८० गुणांच्या पेपरसाठी दिलेला वाढीव अर्धा तास आणि ६० व ४० गुणांसाठी असलेली अधिकची पंधरा मिनिटांची सवलत यंदा होणाऱ्या परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळणार नाही. मात्र, दिव्यागांना मिळणारी सवलत कायम राहणार आहे, असे औरंगाबाद बोर्डाने स्पष्ट केले आहे.

गेल्या वर्षी २५ टक्के अभ्यासक्रम वगळण्यात आला होता. मात्र, यंदा १०० टक्के अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा होईल. सध्या दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. बारावीचे अर्ज भरण्यासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत १ लाख ४८ हजार ६३६ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. दहावीसाठी २५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत असून ९५ हजार ६८२ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. यंदा परिस्थिती सुधारली असून, सर्व शाळा नियमित सुरळीत सुरू असल्याने देण्यात आलेल्या सुविधांची सूट रद्द करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा…

solar energy : सौरऊर्जेच्या वापराने ३२० अब्ज रुपयांची बचत

Recent Posts

करिअर कसे निवडावे?

आनंदी पालकत्व - डाॅ. स्वाती गानू नुकतेच मुलांचे दहावी, बारावी परीक्षांचे निकाल लागले. काॅलेजमध्ये प्रवेशासाठीची…

1 hour ago

“तेरी दुनियासे दिल भर गया”

नॉस्टॅल्जिया - श्रीनिवास बेलसरे तलत मेहमूद एकेकाळी खूप लोकप्रिय गायक होते, हे सर्वांनाच माहीत आहे.…

1 hour ago

मुंबई लोकल…

विशेष - मेधा दीक्षित मुंबईमध्ये लोकलने प्रवास करणाऱ्यांचे एक स्वतंत्र जग आहे. प्रत्येकाचा एक ७.५९,…

2 hours ago

देवव्रतचा भीष्म झाला

विशेष - भालचंद्र ठोंबरे भीष्मपितामह हे महाभारताचे एक प्रमुख पात्र आहे. पितामह भीष्माशिवाय महाभारत अपूर्ण…

2 hours ago

टूकन

निसर्गवेद - डॉ. महालक्ष्मी वानखेडकर ''टूकन” हा जगातील सर्वात अनोखा पक्षी आहे. हा पक्षी निओट्रॉपिकल…

2 hours ago

विवाहित पुरुषाशी लग्न

क्राइम - अ‍ॅड. रिया करंजकर मुंबई हे शहर असे आहे की, या एका शहरामध्ये विविधता…

2 hours ago