मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतच वसुलीचे १०० कोटी तिजोरीत येत होते. फकिरी आणि झोळीची भाषा आयत्या बिळावरचे नागोबा आणि वसुलीबाज नाही करू शकत, असा पलटवार भाजपने शुक्रवारी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केला.
शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. त्याला भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ‘पक पक पकाक’ अशा शीर्षकाने त्यांनी टि्वट केले आहेत. त्यांना हीरक महोत्सव आणि अमृत महोत्सव यातला फरक कळत नाही, हे कसले विचारांचे सोने लुटणार? यांना केवळ वसुली आणि वाझे माहीत आहेत. गुजरात होते म्हणून ड्रग्ज पकडले गेले. तुमच्या मंत्र्यांनी हर्बल तंबाखू म्हणून ते विकून तिजोरी भरली असती. थोडे तुम्हालाही पाठवले असते, असे भातखळकर यांनी म्हटले आहे.
सोनिया गांधी यांचे जोडे उचलणाऱ्यांनी राजनाथ सिंह यांची लायकी काढावी. हा किती मोठा विनोद. पण ते जिंकून आले आहेत, तुमच्यासारखे पंतप्रधानांना फोन करून मागल्या दराने मुख्यमंत्री थोडेच झाले आहेत, अशी उपहासात्मक टीकाही त्यांनी केली. राहुल गांधींची चाकरी स्वीकारल्यापासून हिंदुत्वाशी फारकत घेतली, आता समाजवादी पार्टीची बिर्याणी घरी येऊ लागलेली दिसते, कारण भारत माता की जय, ऐकून पोटात मुरडा येतोय, अशी टीकाही त्यांनी केली.
मुंबई: लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२४मधील(ipl 2024) ६७व्या सामन्यात हरवले. लखनऊने पहिल्यांदा फलंदाजी…
मुंबई: रिलायन्स जिओकडे(reliance jio) सध्या यावेळे ४६ कोटींपेक्षा अधिक लोकांचा कस्टमर बेस आहे आणि आता…
मुंबई: स्मार्टफोन्सच्या किंमती बऱ्याच वाढल्या आहेत. आधी जो रेडमी नोट सीरिजमधील फोन १० ते १५…
नूंs: नूंहमध्ये मोठा अपघात घडला आहे. येथे शुक्रवारी रात्री भक्तांनी भरलेल्या बसला अज्ञात कारणामुळे आग…
सोमवारी २० मे रोजी मुंबई शहरातील सहा लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. सहा लोकसभा मतदारसंघांसाठी…
विवेक वेलणकर: सामाजिक कार्यकर्ते प्रसिद्धीचे एक माध्यम म्हणून अवाढव्य होर्डिंग उभे करण्याचा पायंडा पडला आणि…