मुंबई: कल्याणमध्ये (kalyan) एका तरूणाने अल्पवयीन मुलीची (minor girl) भर रस्त्यात चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. या जीवघेण्या हल्ल्यात त्या मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला. ही मुलगी ११ वर्षांची होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आदित्य कांबळे(वय २५) याला अटक केली आहे.
कल्याणच्या तिसगावमध्ये ही घटना घडली. ही अल्पवयीन मुलगी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आपल्या आईसह घरी जात होती. याच वेळीस सोसायटीच्या परिसरातच या तरूणाने या अल्पवयीन मुलीवर चाकूने सपासप वार केले. त्याचवेळेस तेथील परिसरातील नागरिकांनी ही घटना पाहिली आणि तातडीने तिथे धाव घेत या तरूणाला अडवले.
मात्र त्याआधी या तरूणाने मुलीवर जोरदार वार केले होते. पोलिसांनी या आरोपीला चांगलाच चोप दिला आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. दुसरीकडे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या या मुलीला उपचारासाठी रुग्णालयात नेत असतानाच तिचा वाटेतच मृत्यू झाला. आईसमोर या मुलीवर असा जीवघेणा हल्ला झाल्याने संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, या तरूणाने अल्पवयीन मुलीवर का हल्ला केला याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस पुढील तपास करत आहेत.
मुंबई: लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२४मधील(ipl 2024) ६७व्या सामन्यात हरवले. लखनऊने पहिल्यांदा फलंदाजी…
मुंबई: रिलायन्स जिओकडे(reliance jio) सध्या यावेळे ४६ कोटींपेक्षा अधिक लोकांचा कस्टमर बेस आहे आणि आता…
मुंबई: स्मार्टफोन्सच्या किंमती बऱ्याच वाढल्या आहेत. आधी जो रेडमी नोट सीरिजमधील फोन १० ते १५…
नूंs: नूंहमध्ये मोठा अपघात घडला आहे. येथे शुक्रवारी रात्री भक्तांनी भरलेल्या बसला अज्ञात कारणामुळे आग…
सोमवारी २० मे रोजी मुंबई शहरातील सहा लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. सहा लोकसभा मतदारसंघांसाठी…
विवेक वेलणकर: सामाजिक कार्यकर्ते प्रसिद्धीचे एक माध्यम म्हणून अवाढव्य होर्डिंग उभे करण्याचा पायंडा पडला आणि…