World Cup 2023: टीम इंडियातून ७ खेळाडूंचा पत्ता कट, गेल्यावेळेस वर्ल्डकपमध्ये मिळाली होती संधी

Share

मुंबई: टीम इंडियासाठी(team india) आपल्या भूमीवर होणारा वर्ल्डकप (world cup) अतिशय महत्त्वाचा आहे. भारतीय संघाने २०११ नंतर एकही खिताब जिंकलेला नाही. अशातच रोहित शर्माच्या (rohit sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ वर्ल्डकप जिंकण्यासाठी अतिशय मेहनत घेत आहे. वर्ल्डकपआधी टीम इंडिया ३० ऑगस्टला आशिया कप खेळणार आहे. येथे भारतीय संघाला २ सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध खेळायचे आहे. याशिवाय श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानविरुद्धही सामना रंगणार आहे. हे सर्व संघ वर्ल्डकपमध्ये खेळत आहेत.

वर्ल्डकपमध्ये खेळणार अधिकाधिक खेळाडूंना आशिया कपसाठी संघात जागा मिळू शकते. या स्पर्धेद्वारे टीम मॅनेजमेंटला त्यांना परखण्याची संधी मिळेल. गेल्या वनडे वर्ल्डकपबाबत बोलायचे झाल्यास ७ खेळाडूंचा टीम इंडियातून पत्ता कट झाला आहे. म्हणजेच हे खेळाडू पुन्हा दिसणार नाहीत. यात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह ३ विकेटकीपरही आहेत. धोनीने निवृत्ती घेतली आहे तर ऋषभ पंत दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. दिनेश कार्तिक संघात स्थान बनवण्याच्या स्पर्धेत नाही. वर्ल्डकपचे सामने ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबरदरम्यान रंगणार आहेत.

धवनने ठोकले होते शतक

शिखर धवन २०१९ वनडे वर्ल्डकपमधील २ सामन्यात खेळला होता. त्याने या सामन्यात एका शतकासह १२५ धावा केल्या होत्या. मात्र यानंतर तो अंगठा फ्रॅक्चर झाल्याने स्पर्धेबाहेर गेला. याशिवाय केदार जाधवने ५ डावांत ८०, विजय शंकरने ३ डावांत ५८ तर वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने ६ सामन्यात १० विकेट घेतल्या होत्या. २०१९च्या वर्ल्डकपमध्ये महेंद्रसिंग धोनीने ८ डावांत २७३, ऋषभ पंतने ४ डावांत ११६ तर दिनेश कार्तिकने २ डावांत १४ धावा केल्या होत्या.

रोहितची ५ शतके

रोहित शर्मा या वर्ल्डकपमध्ये कर्णधार म्हणून उतरणार आहे. गेल्या वर्ल्डकपमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात तो खेळण्यास उतरला होता. मात्र सेमीफायनलमध्ये टीम इंडियाला न्यूझीलंडकडून पराभवास सामोरे जावे लागले होते. गेल्या वर्ल्डकपमध्ये रोहित ५ शतके ठोकली होती.

Recent Posts

Lok Sabha Election : राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी

दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…

32 mins ago

Cloudburst : अरे बाप रे! मे महिन्यात इतका पाऊस कसा झाला? हवामान विभागालाही पडला प्रश्न

चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…

47 mins ago

काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी

काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…

1 hour ago

पतंजलीच्या उत्पादनाचा दर्जा निकृष्ट! सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल, तिघांना तुरुंगवास

नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…

1 hour ago

महापालिका सफाई कर्मचारी सुनील कुंभार यांनी सापडलेले १५ तोळे सोने दिले पोलिसांकडे!

महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी केला कुंभार यांचा सत्कार मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका…

2 hours ago

Licence : २० मे रोजीची अपॉइंटमेंट घेतली असल्यास मुंबईत वाहन परवाना चाचण्यांच्या वेळेत बदल

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातल्या अखेरच्या टप्प्यातले मतदान उद्या होत असल्यामुळे वाहन चालनाच्या कोणत्याही प्रकारच्या…

2 hours ago