World Cup 2023: वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियावर पैशांचा पाऊस, पराभवानंतरही टीम इंडियाला मिळाले कोट्यावधी रूपये

Share

मुंबई: ऑस्ट्रेलियाने भारताला हरवत सहाव्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले. या विजयानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघावर जोरदार पैशांचा पाऊस पडत आहे. ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप २०२३च्या फआयनलमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाला हरवत खिताब आपल्या नावे केला. हा ऑस्ट्रेलियाचा सहावा वर्ल्डकप आहे.

या विजयानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघावर जोरदार पैशांचा पाऊस पडला. केवळ ऑस्ट्रेलियाच नव्हे तर टीम इंडियाच्या खेळाडूंनाही कोट्यावधी रूपयांचे बक्षीस मिळाले. आयसीसीकडून वर्ल्डकप २०२३साठी एकूण १० मिलियन अमेरिकन डॉलर(८३ कोटी भारतीय रूपये) ची घोषणा करण्यात आली होती. जिंकणाऱ्या संघाला म्हणजेच ऑस्ट्रेलियाला ४ मिलियन अमेरिकन डॉलरची रक्कम देण्यात आली.

तर हरणाऱ्या संघाला टीम इंडियालाही बक्षीस मिळाले आहे. आयसीसीकडून रनरअप टीमला २ मिलियन अमेरिकन डॉलरचे बक्षीस देण्यात आले.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीमुळे २४० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २४१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ४३ षटकांत पूर्ण केले होते.

Recent Posts

‘आरटीई’अंतर्गत शाळा प्रवेशाची प्रक्रिया मुंबईत सुरू

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…

10 hours ago

मलाच मुख्यमंत्री बनवा अन्यथा मातोश्रीतले बिंग फोडेन!

संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…

11 hours ago

Lok Sabha Election : राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी

दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…

12 hours ago

Cloudburst : अरे बाप रे! मे महिन्यात इतका पाऊस कसा झाला? हवामान विभागालाही पडला प्रश्न

चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…

12 hours ago

काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी

काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…

12 hours ago

पतंजलीच्या उत्पादनाचा दर्जा निकृष्ट! सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल, तिघांना तुरुंगवास

नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…

12 hours ago