चंद्रपूर : पोंभुर्णा वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेपाच वाजता घडली. यामुळे खळबळ माजली आहे.
मागील महिन्याभरापासूनत पोंभुर्णा तालुक्यात वाघाने चार बळी घेतले आहेत. दरम्यानच्या, काळात वनविभागाने गस्त वाढविली असून वाघाच्या हालचालीवर नजर ठेवली होती. मात्र आज पुन्हा वाघाने हल्ला करीत महीलेचा बळी घेतला. घटनेची माहिती मिळताच वनविभाग, पोलीस विभाग घटनास्थळी दाखल झाले. मात्र या घटनेने तालुक्यात दहशत पसरली आहे.
पोंभुर्णा वनपरिक्षेत्रातील वेळवा येथील संध्या विलास बावने (३५) ही महिला पोंभुर्णा नियतक्षेत्रात गेली होती. त्यावेळी अचानक वाघाने हल्ला करीत तिला जागीच ठार केले. ती वेडसर असून अशीच भटकत जंगलात गेल्याची माहिती आहे. या घटनेनंतर परिसरात गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती.
पोंभुर्णा तालुक्यात वाघाची दहशत आजही कायम आहे. पोंभुर्णा वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या कसरगट्टा गावातील शेतशिवारात वाघाने केलेल्या हल्ल्यात मागील महिन्याच्या २४ तारखेला एक महिला ठार झाल्याची घटना घडली होती. मात्र त्या ठिकाणापासून सदर भाग लांब असून हा हल्लेखोर दुसरा वाघ असल्याची पुष्टी सूत्रांनी जोडली.
जाणून घ्या देशात किती टक्के मतदान? मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksbaha Election) पाचव्या टप्प्यात देशातील…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) राज्यात आज पाचव्या…
मुंबई: जिओ आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक रेंजमध्ये डेटा प्लान सादर करत असते. काहींना महिन्याभराची…
मुंबई: मध आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. मधामध्ये व्हिटामिन, मिनरल्स आणि अँटीव्हायरल गुण आढळतात. उन्हाळ्यात…
मुंबई: राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना रद्द होण्यासोबतच आयपीएलच्या लीग सामन्यांची सांगता…
मुंबई: लोकसभा निवडणूक २०२४च्या पाचव्या टप्प्यात आठ राज्यातील ४९ जागांवर आज मतदान होत आहे. सकाळी…