दै. प्रहार सिंधुदुर्ग आवृत्तीच्या १४ व्या वर्धापनदिनानिमित्त सिंधुदुर्गात शुभेच्छांचा वर्षाव

Share

कणकवली (प्रतिनिधी) : दै. प्रहार सिंधुदुर्ग आवृत्तीच्या १४ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली आणि प्रहारच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कणकवली येथील प्रहार भवनच्या कोकण विभागीय कार्यालयात यानिमित्त श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. प्रहारचे संचालक आमदार नितेश राणे यांनी बुधवारी सकाळी यानिमित्ताने प्रहार कार्यालयास भेट देऊन सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

सायंकाळच्या सत्रात प्रांताधिकारी वैशाली राजमाने, नगराध्यक्ष समीर नलावडे, तहसीलदार रमेश पवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार काळे, पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, एसएसपीएम इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. अनिश गांगल, प्रशासकीय अधिकारी शांतेश रावराणे, अनाजी सावंत, प्रा. डॉ. शुभांगी माने तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष विठ्ठल देसाई, बंडू गांगण, सुशील पारकर, नाटळ विकास सोसायटीचे चेअरमन नंदू सावंत, डॉ. विठ्ठल गाड, रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलचे दीपक बेलवलकर, दादा कुडतरकर, वृत्तपत्र एजंट संघटनेचे तालुका अध्यक्ष मालोजी कोकरे, केंद्रप्रमुख शिक्षक सभेचे पदाधिकारी अनंत राणे, युरेका सायन्स क्लबच्या अध्यक्षा सुषमा केणी, संध्या वायंगणकर, नीलिमा सावंत, कणकवली पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर देसाई, आदी मान्यवरांनी सिने, नाट्य क्षेत्रातील कलावंतानी प्रहार कार्यालयात भेट देत शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रहारचे संपादक डॉ. सुकृत खांडेकर, निवासी संपादक संतोष वायंगणकर यांसह प्रहारच्या विविध विंगचे प्रमुख, तालुका प्रतिनिधी यांनी वाचक हितचिंतकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. यावेळी प्रहार परिवारातील प्रतिनिधी, वार्ताहर उपस्थित होते.

Recent Posts

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, दिनांक ४ मे २०२४.

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण एकादशी शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा. योग ऐद्र. भारतीय…

6 hours ago

पाकिस्तानला काँग्रेसचा पुळका

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून भाजपा व भाजपाच्या मित्रपक्षाच्या उमेदवारांचा…

9 hours ago

नियोजनबद्ध कचरा व्यवस्थापन

मिलिंद बेंडाळे, पर्यावरण अभ्यासक कचरा किंवा कचरा व्यवस्थापन ही देशातील मोठी समस्या आहे. दिल्ली, मुंबईसारख्या…

9 hours ago

मतदान जनजागृती काळाची गरज

रवींद्र तांबे दिनांक २० एप्रिल, १९३८ रोजी इस्लामपूर येथे केलेल्या भाषणात भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार…

10 hours ago

MI vs KKR: १२ वर्षांनी वानखेडेवर कोलकाताचा विजय

मुंबई: मुंबईच्या वानखेडे मैदानावर आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगला होता.…

11 hours ago

Narendra Modi : बंगालचे नाव तृणमुलमुळे खराब झाले!

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल कोलकाता : संदेशखालीमध्ये काय घडत आहे हे टीएमसीच्या नेत्यांना…

12 hours ago