मुंबई: भाजप व शिवसेनेची युती घट्ट असून खासदार गजानन कीर्तीकर यांचे काही गैरसमज असतील तर दूर करू. भाजप व शिवसेनेत जागावाटपावरून कोणताही वाद नाही. युती मजबूत आहे, असे वक्तव्य शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.
खासदार गजानन कीर्तिकर यांनी भाजपकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचा जाहीर आरोप केला होता. यावर आज पत्रकारांशी बोलताना दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण दिले. दीपक केसरकर म्हणाले, कीर्तिकर यांचे काही काम होत नसेल किंवा गैरसमज असतील तर ते चर्चेतून दूर केले जातील. लोकसभेसाठी युतीत २०१९ चाच फॉर्म्युला राहील. अंतिम निर्णय दोन्ही नेत्यांचा असेल. कोकणातून लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत ते म्हणाले, मी राज्यातच खुश आहे.
दीपक केसरकर म्हणाले, आमदारांच्या अपात्रतेसह इतर मुद्द्यांवर निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहे. विधानसभेतील ते सर्वोच्च नेते आहेत. तरीही संजय राऊत त्यांना अक्षरश: धमक्या देतात. त्यामुळे संजय राऊतांवर तातडीने हक्कभंगाची कारवाई झाली पाहीजे. त्यांच्यावर अद्याप हक्कभंग का झाला नाही, हा एक प्रश्नच आहे.
मुंबई: आयपीएल २०२४चा प्लेऑफचा टप्पा २१ मेपासून सुरू होत आहे. सनरायजर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स,…
मुंबई: आवळ्यामध्ये औषधीय गुण भरलेले असतात. आयुर्वेदात आवळ्यामध्ये अनेक पोषकतत्वे सांगितलेली आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने आवळा…
मतदारयादीत नाव नसल्याने मतदारांचा हिरमोड मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदार संघात…
मुंबई: अंबाती रायडू(ambati raydu) इंडियन प्रीमियर लीगमध्ये(indian premier league) मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ससाठी…
मुंबई: प्रत्येक आई-वडिलांना वाटत असले की विकास योग्य पद्धतीने व्हावा. मात्र हे समजून घेणे गरजेचे…
कुटुंबीय सुरक्षित मात्र मालमत्तेचे नुकसान मुंबई : ‘बिग बॉस’ रिअॅलिटी शोमधून (Bigg Boss reality show)…