मुंबई : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. पाटील यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. संपामुळे ग्रामीण भागातल्या जनतेचे हाल होताहेत, हे सरकारला आत्ता समजले? लाल परी धावत नसल्याने ग्रामीण भागातली प्रवास व्यवस्था लंगडी झाली आहे. त्याकडे लक्ष द्यायला शरद पवार यांना आजवर का वेळ झाला नाही? आजचा मुहूर्त होता का? असा सवाल करत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना लक्ष्य केले आहे.
तसेच, बैठकीनंतर परिवहनमंत्री अनिल परब यांनी मनोरंजन केले. एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार नाही, असे परब सांगतात. मग आजवर कारवाई झालेल्यांचे काय? कारवाईची भीती मविआ सरकारवरील अविश्वासातून निर्माण होते आहे. कारवाई नाही, पगारवाढीसाठी चर्चा करू, विलिनीकरणाचे कोर्ट सांगेल ते पाहू… मग मविआ सरकारकडे कर्मचाऱ्यांसाठी आहेच काय?’, असाही प्रश्न पाटील यांनी विचारला आहे.
कधी जाहीर होणार निकाल? मुंबई : केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ म्हणजेच CBSE बोर्डाच्या दहावी आणि…
जाणून घ्या नेमकं कसं उजळलं कर्मचाऱ्यांचं नशीब सिंगापूर : साधारणत: कंपन्यांकडून सणासुदीला किंवा नवीन वर्षाच्या…
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election) प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या विजयासाठी जोरदार तयारी करत…
सोनिया सेनेची गुलामी करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी भगव्याचा अवमान केला चंद्रशेखर बावनकुळे यांचा घणाघात मुंबई :…
मुंबई : पावसाळा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच आता निसर्गप्रेमींचे पावसाळी पिकनिकचे प्लॅन…
९७० ग्रॅम सोने आणि ५ किलो चांदीही केली जप्त बीड : बीड शहरातील एक कोटी…