आयपीएलचा १४वा हंगाम कुठे खेळवायचा?

Share

नवी दिल्ली:  कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवरून आयपीएलचा १४वा हंगाम खेळवण्याबाबत बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ सावध पावले उचलत आहे.

बीसीसीआयकडे आयपीएल आयोजित करण्याचे दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे १० संघांसह होम-अवे मॅच फॉरमॅटमध्ये सामने खेळणे. जे स्टेडियम संघाच्या मालकीचे असेल तेथेच सामने झाले पाहिजेत. बीसीसीआयसाठी आणखी एक मार्ग म्हणजे हंगामातील संपूर्ण सामने मुंबईतील तीन स्टेडियममध्ये (वानखेडे, सीसीआय आणि डीवाय पाटील स्टेडियम) आयोजित करणे. जिथे सर्व संघ आपले सर्व सामने खेळतील.

यूएई हा बीसीसीआयचा शेवटचा पर्याय आहे

बीसीसीआयकडे शेवटचा पर्याय म्हणजे सलग तिसऱ्या वर्षी आयपीएल यूएईमध्ये आयोजित करणे. जिथे त्यांनी खेळाडूंच्या पूर्ण सुरक्षेसह स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले आहे. मात्र या पर्यायावर सध्या कोणतीही चर्चा झालेली नाही.

स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल

बीसीसीआय कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर वेळापत्रकात बदल करून डबल हेडर सामन्यांची संख्या कमी करण्याचा विचार करत आहे. पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार, आयपीएल २०२२ स्पर्धा २ एप्रिलपासून सुरू होणार आहे. अशा स्थितीत स्पर्धेच्या सुरुवातीची तारीख एक आठवडा मागे ढकलली जाऊ शकते. अशा स्थितीत ही स्पर्धा २५ मार्चपासून सुरू होऊ शकते. मात्र कोरोनाची परिस्थिती पाहून या सर्व योजना अमलात आणल्या जातील.

आयपीएल २०२२साठी खेळाडूंच्या लिलावाच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. ते कधी आणि कुठे होणार, हे स्पष्ट नाही. मात्र करोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने राज्य सरकार विविध प्रकारचे निर्बंध लादत आहेत. अशा परिस्थितीत लिलावाचे ठिकाणही बदलू शकते.

Tags: ipl

Recent Posts

‘आरटीई’अंतर्गत शाळा प्रवेशाची प्रक्रिया मुंबईत सुरू

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…

4 hours ago

मलाच मुख्यमंत्री बनवा अन्यथा मातोश्रीतले बिंग फोडेन!

संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…

5 hours ago

Lok Sabha Election : राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी

दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…

5 hours ago

Cloudburst : अरे बाप रे! मे महिन्यात इतका पाऊस कसा झाला? हवामान विभागालाही पडला प्रश्न

चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…

5 hours ago

काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी

काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…

6 hours ago

पतंजलीच्या उत्पादनाचा दर्जा निकृष्ट! सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल, तिघांना तुरुंगवास

नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…

6 hours ago