मुंबई : सध्या कोणत्याही समस्येची पाहणी हे हवाई पद्धतीने करण्याची फॅशन आली आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.
नुकतेच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्गाची हवाई पाहणी केली. परंतू त्यांनी आणि राज्य सरकारनेही वारंवार डेडलाईन दिल्यानंतरही अजूनही या कामाची डेडलाईन पूर्ण झालेली नाही. यावरुन हायकोर्टाने आपले मत व्यक्त करताना नाराजी व्यक्त केली.
आम्हाला प्रत्येक नागरिकाचा जीव महत्वाचा असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. राज्य सरकारने मनात आणले तर या महामार्गावर ट्रॉमा सेंटर उभारण्याचे काम काही दिवसांमध्ये पूर्ण होऊ शकते, असे मत न्यायालयाने यावेळी व्यक्त केले.
तसेच याबाबत राज्य सरकारने आपले मत लवकरात लवकर व्यक्त करावे, असेही न्यायालयाने सांगितले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी ७ जून रोजी होणार आहे.
गेल्या १३ वर्षापासून मुंबई-गोवा हायवेचे काम रखडले आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे कोकणातील वकील ओवेस पेचकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला व संदीप मारणे यांच्यासमोर सुनावणी झाली.
या महामार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू असून याचे काम केंद्र सरकारच्या अंतर्गत आहे. सध्या हा रस्ता प्रवाशांसाठी मोठी डोकेदुखी ठरलेला आहे.
कालच्या राड्याप्रकरणी मिहिर कोटेचा यांचा मुंबईकरांना सवाल मविआच्या २५-३० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल; ५ जण पोलिसांच्या…
हसन मुश्रीफांनी घटनेची दखल घेत तातडीने आर्थिक मदत करण्याच्या दिल्या सूचना कोल्हापूर : कोल्हापुरातून (Kolhapur)…
कारण सांगताच घरचेही अवाक नवी दिल्ली : 'तारक मेहता का अलटा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतून…
मुंबई: लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२४मधील(ipl 2024) ६७व्या सामन्यात हरवले. लखनऊने पहिल्यांदा फलंदाजी…
मुंबई: रिलायन्स जिओकडे(reliance jio) सध्या यावेळे ४६ कोटींपेक्षा अधिक लोकांचा कस्टमर बेस आहे आणि आता…
मुंबई: स्मार्टफोन्सच्या किंमती बऱ्याच वाढल्या आहेत. आधी जो रेडमी नोट सीरिजमधील फोन १० ते १५…