Income Tax : ज्यांनी अद्याप इन्कम टॅक्स भरला नाही त्यांचे पुढे काय?

Share
काळजी करू नका! ३१ डिसेंबरपर्यंत रिटर्न भरता येईल! पण १ ते ५ हजारापर्यंत दंड भरावा लागेल

मुंबई : इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२३ होती. पण तरीही तुम्ही आयटीआर (Income Tax) भरला नसेल, तर तुम्ही ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत भरू शकता. ज्या करदात्यांच्या खात्यांचे ऑडिट करणे आवश्यक नाही, त्यांच्यासाठी दंडाशिवाय इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै होती. रिपोर्टनुसार, बहुतेक करदात्यांनी आधीच त्यांचे विवरणपत्र भरले आहे.

ज्यांनी अद्याप प्राप्तिकर भरला नाही मात्र उशीरा इन्कम टॅक्स रिटर्न फाईल भरल्यास, ५००० रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल. ५ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या करदात्यांना लेट फी १,००० रुपये आहे, तर इतरांसाठी ५,००० रुपये आहे.

३१ जुलै नंतर इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याच्या बाबतीत, तुम्हाला देय असलेल्या कोणत्याही करावर दरमहा १ टक्के दराने दंडात्मक व्याज भरावे लागेल.

जेव्हा शेवटच्या तारखेपूर्वी इन्कम टॅक्स रिटर्न दाखल केला तर करदात्यांना १ एप्रिलपासून रिफंडच्या तारखेपर्यंत रिफंडच्या रकमेवर दरमहा ०.५ टक्के दराने व्याज मिळते. तथापि, उशीरा रिटर्न फाइलच्या बाबतीत, हे व्याज इन्कम टॅक्स रिटर्न भरल्याच्या तारखेपासून परताव्याच्या तारखेपर्यंत दिले जाते.

आयकर विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २०२३-२४ या आर्थिक वर्षात ३१ जुलैपर्यंत ६.७ कोटीहून अधिक करदात्यांनी आयकर रिटर्न भरले आहेत. यापैकी, ५.६२ कोटी पेक्षा जास्त आयटीआर करदात्यांनी व्हेरीफाय केले आहे. ३१ जुलैपर्यंत ३.४४ कोटी रिटर्न्सची पडताळणी झाली.

आयटीआर दाखल करणाऱ्यांची संख्या वर्षानुवर्षे वाढत आहे. गेल्या वर्षी ३१ जुलैपर्यंत ५.८३ कोटीहून अधिक रिटर्न भरले होते, तर यावेळी ही संख्या वाढली आहे. या वर्षी भरलेले एकूण परतावे (ऑडिटसह) सुमारे ८.५ कोटी आहेत.

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Tags: income tax

Recent Posts

‘आरटीई’अंतर्गत शाळा प्रवेशाची प्रक्रिया मुंबईत सुरू

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…

4 hours ago

मलाच मुख्यमंत्री बनवा अन्यथा मातोश्रीतले बिंग फोडेन!

संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…

4 hours ago

Lok Sabha Election : राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी

दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…

5 hours ago

Cloudburst : अरे बाप रे! मे महिन्यात इतका पाऊस कसा झाला? हवामान विभागालाही पडला प्रश्न

चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…

5 hours ago

काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी

काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…

6 hours ago

पतंजलीच्या उत्पादनाचा दर्जा निकृष्ट! सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल, तिघांना तुरुंगवास

नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…

6 hours ago