महाराष्ट्रातील
साडेतीन शक्तिपीठे !
कोल्हापूरची अंबाबाई (महालक्ष्मी): कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर हे एक पूर्ण शक्तीपीठ आहे.
कोल्हापूरची महालक्ष्मी देवी हे एक प्राचीन शक्तीपीठ असून देवीच्या काळ्या पाषाणातील मूर्तीला खास ऐतिहासिक महत्त्व आहे.
तुळजापूरची तुळजाभवानी: तुळजापूर येथील तुळजा भवानी मंदिर हे देखील पूर्ण शक्तीपीठांपैकी एक आहे.
तुळजाभवानी शिवाजी महाराजांची कुलदेवी आहे. देवीचे मंदिर हेमाडपंथी शैलीत असून, येथे नवरात्र २१ दिवस साजरी केली जाते.
माहूरची रेणुकादेवी: नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील रेणुका मंदिर हे पूर्ण शक्तीपीठ मानले जाते.
१३व्या शतकात यादव राजांनी बांधलेले रेणुकादेवीचे मंदिर डोंगरावर वसलेले आहे.
वणी येथील सप्तशृंगी माता: नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी देवीचे मंदिर हे अर्धे शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते.
नाशिकजवळील गडावर वसलेली अठरा भुजांची सप्तशृंगी देवी अर्धे शक्तीपीठ आहे. ती महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे एकत्रित रूप मानली जाते.
Click here