घरातील फळ, भाज्या केमिकल फ्री करण्यासाठी घरगुती उपाय

रासायनिक खतांचा वापर केलेल्या भाज्या आपल्या पोटात गेल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

रसायनांनी भरलेली फळे आणि भाज्या खाल्ल्याने उलट्या, जुलाब, त्वचेच्या समस्या होऊ शकतात. 

एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यात १ चमचा बेकिंग सोडा, १ चमचा सायट्रिक अ‍ॅसिड घालून त्यात फळ आणि भाज्या १५ मिनिट ठेवा.

सर्व फळे आणि भाज्या बाहेर काढून नळाखाली साध्या पाण्याने धुवून वापरायला घ्या.

साध्या पाण्यात थोडे व्हिनेगर आणि जाड मीठ घालून या पाण्याने सर्व भाज्या धुवून घ्या.

गरम पाण्याचा वापर केल्याने फळ आणि भाज्यांमधील बॅक्टेरिया दूर होतात.

शक्य असेल तर बाजारामधील भाजीपाला खाण्याऐवजी आपल्या घरी बाग तयार करा किंवा सेंद्रिय भाजी खरेदी करा.