आम्ही तुमच्यासोबत आहोत, आज आणि नेहमी…पराभवानंतर टीम इंडियाला पंतप्रधान मोदींनी दिला पाठिंबा

Share

अहमदाबाद: आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३च्या अंतिम सामन्यात भारताला हरवत ऑस्ट्रेलियन संघाने सहा विकेटनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाचा संघ सहाव्यांदा चॅम्पियन ठरला. तर तिसऱ्यांदा खिताब जिंकण्याचे भारताचे स्वप्न भंगले. सोबतच भारताच्या यजमानपदाखाली खेळवण्यात आलेल्या आयसीसी वनडे विश्वचषक २०२३ची सांगता भारतासाठी निराशाजनक ठरली.

यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या खेळाडूंचे सांत्वंन केले. त्यांनी लिहिले, प्रिय टीम इंडिया, वर्ल्डकपदरम्यान तुमची प्रतिभा आणि दृढ संकल्प उल्लेखनीय होता. तुम्ही खूपच छान खेळलात आणि देशाला गौरव मिळवून दिलात. आम्ही आज आणि नेहमीच तुमच्यासोबत उभे आहत.

तर काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, टीम इंडिया तुम्ही संपूर्ण स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली. जिंकलात किंवा हरलात आम्ही तुमच्यावर प्रेम करतो. सोबतच विश्वचषकात शानदार विजयासाठी ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन.

रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगलेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला सहा विकेट राखत हरवले. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २४१ धावांचे आव्हान दिले होते. मात्र पॅट कमिन्सच्या संघाने हे आव्हान ४३ षटकांतच पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाचा संघ सहाव्यांदा विश्वविजेता ठरला.

Recent Posts

Jio चा शानदार प्लान, एकदा रिचार्ज करा मिळवा ७३० जीबी डेटा

मुंबई: जिओ आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक रेंजमध्ये डेटा प्लान सादर करत असते. काहींना महिन्याभराची…

1 hour ago

उन्हाळ्यात मध खाण्याचे हे आहेत जबरदस्त फायदे

मुंबई: मध आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. मधामध्ये व्हिटामिन, मिनरल्स आणि अँटीव्हायरल गुण आढळतात. उन्हाळ्यात…

2 hours ago

IPL 2024: प्लेऑफचे सामने कुठे आणि कधी रंगणार? कोणत्या संघामध्ये होणार सामना घ्या जाणून

मुंबई: राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना रद्द होण्यासोबतच आयपीएलच्या लीग सामन्यांची सांगता…

3 hours ago

Lok Sabha Election 2024: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात, अनेक दिग्गज मैदानात

मुंबई: लोकसभा निवडणूक २०२४च्या पाचव्या टप्प्यात आठ राज्यातील ४९ जागांवर आज मतदान होत आहे. सकाळी…

4 hours ago

‘आरटीई’अंतर्गत शाळा प्रवेशाची प्रक्रिया मुंबईत सुरू

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…

18 hours ago

मलाच मुख्यमंत्री बनवा अन्यथा मातोश्रीतले बिंग फोडेन!

संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…

18 hours ago