मुंबई : यंदा मान्सून वेळेआधी दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. सोमवारी मान्सून अंदमान आणि निकोबारमध्ये दाखल झाला आहे. यामुळे केरळमध्ये मान्सून चार दिवस तर मुंबईत ३ दिवस आधीच मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. पण यासोबतच शुक्रवारपर्यंत मुंबईमध्ये प्री-मान्सूनची शक्यता आहे. हवामानतज्ज्ञ दिनेश मिश्रा यांनी सांगितले की, मान्सूनचा आतापर्यंत प्रवास चांगला राहिल्यामुळे २० ते २१ मे रोजी मुंबईत मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता आहे.
वेळेआधीच मान्सून सुरू होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्यामुळे पालिकेसमोर साफसफाईचे मोठे आव्हान आहे. मान्सूनपूर्व नाल्याची सफाई अद्यापही पूर्ण झालेली नाही. बीएमसीने नाले सफाईसाठी ३१ मे ही तारीख निश्चित केली आहे. आतापर्यंत नाल्याच्या साफसफाईचे अनेक काम बाकी आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर मान्सूनपूर्व पाऊस झाल्यास नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
दिनेश मिश्रा म्हणाले की, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवास चांगला झाला. त्यामुळे केरळसह मुंबईत मान्सून वेळेआधी दाखल होईल. दुसरीकडे, केरळच्या किनारपट्टीवर येत्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोकण किनारपट्टीसह राज्यातील ९ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
इंदौरमधील 'त्या' प्रकारावर भाजपा प्रवक्ते अलोक दुबे यांची टीका इंदौर : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची…
'छाती फाडली की मरून जाशील' आणि 'तु किस झाड की पत्ती' बीड : छाती फाडली…
नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम आणि जिओ सिनेमा सारख्या १५ प्रीमियम ॲप्सचा समावेश अमर्यादित डेटासह 30 Mbps…
आमदार नितेश राणे यांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल नालासोपारा : ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanka…
दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का; नेमकं प्रकरण काय? नवी दिल्ली : क्रिकेटविश्वात सध्या आयपीएलची (IPL 2024)…
भाजपात होणार सामील? जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) धामधुमीत काल ठाकरे गटाला (Thackeray Group)…