मथुरा: उत्तर प्रदेशच्या मथुरेमध्ये मंगळवारी बांके बिहारी मंदिराजवळ मोठी दुर्घटना घडली. येथील दुसायत मोहल्ल्यामध्ये तीन मजली जुनी इमारतीचा छज्जा आणि भिंत कोसळल्याने तब्ब १२ लोक जखमी झाले आहेत. जिल्हाधिकारी पुलकित खरे यांनी पाच लोकांचा मृत्यू झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला.
दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि प्रशासनाचे अधिकारी पोहोचले. जखमींच्या उपचारासाठी वृंदावनच्या सौ शैया रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पावसामुळे तीन मजल्याची इमारतीचा छज्जा कोसळला.
डीएम पुलकित खरे यांनी सांगितले की जुन्या इमारतीचा छज्जा आणि भिंत कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला. तर चार लोकांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, ज्यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला तसेच जे जखमी झाले त्यांना मदतकार्य दिले जाईल. दरम्यान, ही दुर्घटना का घडली याचा तपास केला जाईल. मात्र गेल्या काही दिवसांपासून येथे पाऊस कोसळत आहे.
दुसरीकडे एसएसपी शैलेश पांडेय यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसायत मोहल्लेकडे एक जुनी तीन मजली घर होते. मात्र अचानकपणे घरचा वरचा भाग कोसळला. यामुळे मलब्याखाली अनेक जण दबले गेले. पोलिसांच्या टीमसोबत फायर बिग्रेड टीमही बचावकार्यात व्यस्त आहे. दरम्यान, नगर विकास अधिकाऱ्यांच्या टीमलाही घटनास्थळी बोलावले आहे. जर इमारतीचा एखादा भाग जर कोसळलेला असेल तर या घराला पाडण्याचे काम केले जाईल. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.
मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…
संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…
दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…
चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…
काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…
नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…