नाशिक : मुंबई-नाशिक या दरम्यानचा प्रवास जलद गतीने व्हावा यासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. आज खासदार गोडसे यांनी संसदेत प्रश्न उपस्थित करून अवघ्या सभागृहाचे लक्ष वेधले.
मुंबई ते नाशिक या दरम्यानच्या प्रवासासाठी प्रवाशांना अडचणीचा ठरणाऱ्या इगतपुरी-कसारा या दरम्यानच्या घाट परिसरातील प्रस्तावित चौथ्या आणि पाचव्या रेल्वे लाईनच्या सर्व्हेक्षणाच्या कामाची प्रगती कोणत्या स्तरावर आहे असा सवाल करत प्रवाशांच्या वेळची बचत होणेकामी तातडीने चौथ्या आणि पाचव्या रेल्वे लाईनच्या सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण करण्यात यावे अशी आग्रही मागणी खासदार गोडसे यांनी केली आहे.
मुंबईकडून नाशिकला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाडयांना इगतपुरी ते कसारा या दरम्यानच्या लोहमार्गावरूनच धावावे लागते. इगतपुरी ते कसारा हे १६ कि.मी. चे अंतर असून या दरम्यानच्या घाट परिसरांत पूर्वीपासून असलेले टनल हे कमी व्यासाचे आहेत. यामुळे रेल्वे गाड्यांना वाढीव इंजिन ,बॅकर्स लावण्याची गरज असते. परिणामी इगतपूरी – कसारा या दरम्यानच्या घाट परिसरात सतत रेल्वेगाडया थांबवाव्या लागत असल्याने प्रवासास विलंब होतो. याबरोबरच बँकरवर मोठा खर्चही होतो. यावर उपाय म्हणून कसारा ते इगतपुरी या दरम्यानच्या रेल्वेलाईनची चढाई कमी व्हावी आणि चौथ्या व पाचव्या रेल्वे लाईनच्या कामाला प्रारंभ व्हावा यासाठी खा. गोडसे यांचा केंद्राकडे पाठपुरावा सुरू आहे.
इगतपुरी -कसारा या दरम्यानच्या घाट परिसरातून सुमारे दिडशे मालगाडया आणि प्रवासी रेल्वे गाडया धावतात. उंच घाट असल्याने सर्वच रेल्वे गाडया कमी वेगाने चालतात. यातून प्रवाशांना दिलासा मिळावा तसेच प्रवास जलद गतीने व्हावा यासाठी खा. गोडसे यांनी आज थेट संसदेतच आवाज उठवला. मुंबई -नाशिक या दरम्यानच्या प्रवासासाठी कसारा घाट हा मुख्य अढथळा आहे. स्वतंत्र मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली असली तरी घाट परिसरातील परिस्थितीत बदल झालेला नसल्याचे खा. गोडसे यांनी केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिले. इगतपुरी – कसारा या दरम्यानच्या घाट परिसरातील प्रस्तावित चौथ्या आणि पाचव्या रेल्वे लाईनच्या सर्वक्षणाचे कामाची प्रगती कोणत्या स्तरावर आहे असा सवाल करत प्रवाशांच्या वेळची बचत होणेकामी तातडीने चौथ्या आणि पाचव्या रेल्वे लाईनचे सर्वेक्षण लवकर पूर्ण करून कामाला प्रारंभ करावा अशी आग्रही मागणी खा.गोडसे यांनी केली आहे.दरम्यान कसारा घाट हा देशातील सर्वात मोठया चढाईच्या घाटांपैकी एक घाट असून घाट १:३७ ग्रेडीयंटचा आहे. घाटाची चढाई कमीत कमी होण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्या अनुषंगाने चौथ्या आणि पाचव्या रेल्वे लाईनचे सर्व्हेक्षण आणि डिझाईनचे काम वेगाने सुरू असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खा. गोडसे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली आहे.
मुंबई: आवळ्यामध्ये औषधीय गुण भरलेले असतात. आयुर्वेदात आवळ्यामध्ये अनेक पोषकतत्वे सांगितलेली आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने आवळा…
मतदारयादीत नाव नसल्याने मतदारांचा हिरमोड मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदार संघात…
मुंबई: अंबाती रायडू(ambati raydu) इंडियन प्रीमियर लीगमध्ये(indian premier league) मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ससाठी…
मुंबई: प्रत्येक आई-वडिलांना वाटत असले की विकास योग्य पद्धतीने व्हावा. मात्र हे समजून घेणे गरजेचे…
कुटुंबीय सुरक्षित मात्र मालमत्तेचे नुकसान मुंबई : ‘बिग बॉस’ रिअॅलिटी शोमधून (Bigg Boss reality show)…
नवी दिल्ली : देशात होणारी ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) रोखण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) तब्बल…