Vidhan parishad Elections : विधानपरिषदेच्या ४ जागांसाठी निवडणुका जाहीर; कधी होणार मतदान?

Share

पुढे ढकलण्यात आली होती निवडणूक… आता कसं असणार नवं वेळापत्रक?

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) धामधुमीतच महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या (Vidhan parishad) ४ जागांसाठी निवडणुकांचा घाट घालण्यात आला होता. १० जून या दिवशी यासाठी मतदान होणार होते. मात्र, एका कारणास्तव या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या. यानंतर आता या निवडणुकांच्या तारखा पुन्हा जाहीर करण्यात आल्या आहेत. नव्या निवडणूक वेळापत्रकानुसार, २६ जून रोजी मतदान पार पडणार आहे, तर १ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.

विधानपरिषदेच्या चार जागांमध्ये दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदारसंघांसाठी ही निवडणूक होत आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार संघ, तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदार संघात ही निवडणूक होणार आहे. ७ जुलै २०२४ रोजी मुंबई पदवीधर मतदारसंघाचे आमदार विलास पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, नाशिक शिक्षक मतदारसंघाचे आमदार किशोर दराडे तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार कपिल पाटील यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे या चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

कसा असेल निवडणुकीचा कार्यक्रम?

चार जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रकिया ३१ मे रोजी सुरू होणार आहे. तर ७ जून हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असणार आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर १० जून रोजी अर्जांची छाणणी केली जाणार आहे. तसेच अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख १२ जून आहे. प्रत्यक्ष मतदान हे २६ जून रोजी होणार आहे, तर १ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.

का पुढे ढकलली होती निवडणूक?

महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने २ मे ते १४ जूनपर्यंत सुट्टीचा कालावधी जाहीर केला असून शाळा १५ जून नंतर सुरु होणार आहेत. तसेच १७ जून ते २० जून पर्यंत बकरी ईद निमित्त उर्दू माध्यमांच्या शाळांना सुट्टी असणार आहे. मुंबईतील शिक्षक पदवीधर मतदार संघातील उत्तर भारतीय शिक्षक टिचर्स स्पेशल ट्रेनने ११ जून २०२४ रोजी मुंबईत परतणार आहेत. तसेच महाराष्ट्रातील अनेक शिक्षक सुट्टी कालावधीत मूळ गावी किंवा कुटुंबासह पर्यटनासाठी बाहेरगावी गेले आहेत. त्यामुळे मतदानावर त्याचा परिणाम पडू शकतो, असा शिक्षक संघटनांचा दावा होता. उपरोक्त सर्व बाबींचा विचार करुन ही निवडणूक पुढे ढकलली होती.

Recent Posts

Monsoon: राज्यात मान्सूनचा वेग मंदावला, पाहा कधीपासून होणार सक्रिय

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात मान्सूनचा वेग मंदावला आहे. राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण तसेच…

49 mins ago

Foods: कच्चे नव्हे हे पदार्थ खा उकडून, होतील बरेच फायदे

मुंबई: असे म्हटले जाते जेवण उकडणे हे ते फ्राय करण्याच्या तुलनेत चांगले असते. तुम्हाला ऐकून…

2 hours ago

रा. जि.प शाळा चोरढे मराठी येथे साकारला नवागतांचा मेळावा….

मुरुड, (प्रतिनिधी संतोष रांजणकर) हर्ष हा साकारला मनी आनंदाच्या या क्षणी नवागतांचे करी स्वागत सर्व…

10 hours ago

Mobile: दिवसभरात किती तास वापरला पाहिजे मोबाईल फोन? तुम्हाला माहीत आहे का…

मुंबई: आजच्या काळात मोबाईल फोन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. संपूर्ण दिवस हल्ली सगळेच…

11 hours ago

Hardik pandya: हार्दिक पांड्याचा मुलासोबत क्यूट Video, नाही दिसली पत्नी

मुंबई: आयसीसी पुरुष टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये भारतीय संघाची कामगिरी चांगली होत आहे आणि ते सुपर…

11 hours ago

Health: तुम्ही मुलांना टाल्कम पावडर वापरता का? आजच थांबा

मुंबई: मुलांमध्ये उन्हाळा आणि घामापासून बचावासाठी अधिकतर आंघोळीनंतर मुलांना भरपूर टाल्कम पावडर लावतात. असे केल्या…

13 hours ago