मुंबई : नव्या वर्षाची सुरुवात होत असताना पुन्हा एकदा राज्यात कोरोनाने डोकं वर काढलंय. पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय. या सगळ्यात विविध नियम लागू करण्यात आले आहेत. एकीकडे चित्रपटगृह, नाट्यगृहांमध्ये 50 टक्के आसनक्षेमतेची परवानगी असताना आता काही ठिकाणी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बंधने वाढवण्यात आली आहेत.
याच कारणामुळे कोल्हापूर भागात नाट्यगृहांमध्ये आता 50 प्रेक्षकांनाच परवानगी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरातील नाटकाचे काही प्रयोग रद्द करण्यात आले आहेत. अभिनेते संदीप पाठक यांचं ‘वऱ्हाड निघालय लंडनला’ नाटकाचे प्रयोग कोल्हापूरात होणार होते. मात्र फक्त 50 प्रेक्षकांना परवानगी असल्या कारणाने कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी या ठिकाणी या नाटकाचे प्रयोग रद्द करण्यात आले आहेत. फक्त 50 प्रेक्षकांना परवानगी असल्याने या नाटकांसाठी ही बाब परवडणारी नसल्याने या नाटकाचे प्रयोग काही ठिकाणी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
प्रसाद ओकने नेमका कशावर व्यक्त केला संताप? मुंबई : हल्ली सोशल मीडियावर (Social media) इन्फ्लुएंसर्सची…
प्रवासी संघटनांनी व्यक्त केला संताप मुंबई : लोकल म्हणजे मुंबईकरांची (Mumbai Local) जीवनवाहिनी समजली जाते.…
मृतांमध्ये नऊ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश; तर तीन जण जखमी अकोला : गेल्या काही दिवसांत अपघातांच्या…
उद्धव ठाकरेंनी ऐनवेळी शब्द फिरवल्याचा केला आरोप नाशिक : लोकसभेच्या दृष्टीने नाशिकची जागा (Nashik Loksabha)…
नवी दिल्ली : काँग्रेसने आज उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी मतदारसंघातून काँग्रेस उमेदवारांची घोषणा केली.…
मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी महामुंबई मेट्रो प्रशासनाचा निर्णय मुंबई : मतदान (Voting) हा प्रत्येक नागरिकाचा हक्क…