पालघर : १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणास आजपासून सुरुवात झाली असून चहाडे येथील स्वर्गीय श्रीमती तारामती हरिश्चंद्र पाटील विद्यालय येथे जिल्हास्तरीय शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्षा वैदही वाढाण मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे, पालघर पं. स. सभापती रंजना म्हसकर, जि. प. सदस्य नीता पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी सानिका रजनीकांत पाटील, विश्रामपूर या १५ वर्षीय आशा स्वयंसेविकेच्या मुलीस लस देऊन लसीकरणास सुरुवात करण्यात आली.
शाळा आणि महाविद्यालयापासून लसीकरणाची सुरुवात करण्यात येणार असून १५ ते १८ वयोगटातील एकूण १ लाख ६८ हजार ९१२ मुलांना लस देण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती यावेळी डॉ. अभिजित खंदारे यांनी दिली.
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी हा शुभारंभ होत असून ही आनंदाची गोष्ट आहे. आरोग्य विभाग, आशा, अंगणवाडी स्वयंसेविका यांच्यामुळे ही मोहीम यशस्वी होईल, असे मत यावेळी अध्यक्ष वाढाण यांनी व्यक्त केले. तसेच प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी लसीकरण गरजेचे असून लसीकरणाबाबत कुठलीही भीती मनात बाळगू नका, असे उपस्थित विद्यार्थ्यांना सांगून कोरोनाची तिसरी लाट आपण थोपवू शकतो, असा विश्वास व्यक्त करून रुग्णांची संख्या वाढत असल्याने कोरोनाचे सर्व नियम पाळा आणि कुठल्याही अफवांवर जनतेने विश्वास ठेवू नये, असे आवाहन वैदेही वाढाण यांनी केले.
लहानपणी जे लसीकरण झाले आहे त्याचाच हा भाग असून आता कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर ही लस देण्यात येणार आहे. त्यामुळे मुलांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे प्रतिपादन यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले.
यानंतर मासवण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीची पाहणी करून लवकरात लवकर इमारतीचे उद्घाटन करण्यात यावे, अशा सूचना अध्यक्ष वाढाण यांनी केल्या. यावेळी चहाडे ग्रामपंचायतीच्या सरपंच, आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी कर्मचारी अधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, आशा, अंगणवाडी सेविका उपस्थित होते.
MI vs KKR: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा…
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल कोलकाता : संदेशखालीमध्ये काय घडत आहे हे टीएमसीच्या नेत्यांना…
पुण्यात विनोद तावडे यांचं वक्तव्य पुणे : एनडीए सरकारची (NDA) दहा वर्षाची कामगिरी आणि २०४७…
मुंबई : लोकसभा निवडणुकीदरम्यान डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करून…
मुंबई: आपण सर्व आठवडाभर फळे आणि भाज्या रेफ्रिजेटरमध्ये स्टोर करतात. मात्र काही फळे फ्रीजमध्ये ठेवल्याने…
राममंदिराच्या विरोधकांसोबत उद्धव गेले; ते महाराष्ट्राचा गौरव काय सांभाळणार? रत्नागिरीतून अमित शाह यांचे टीकास्त्र रत्नागिरी…