निवडणुकीनंतर उबाठा सेनेचे अस्तित्व संपून जाईल: नारायण राणे

Share

रत्नागिरी : येत्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना (उबाठा) चे अस्तित्व “पुसून” जाईल, त्याला एकटे उद्धव ठाकरे जबाबदार असतील, असा घणाघात भाजप नेते नारायण राणे यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीतून व्यक्त केला आहे. राज्याच्या राजकारणात सध्या जे घडत आहे ते “लोकशाहीसाठी चांगले नाही” असे त्यांनी मत व्यक्त केले.

रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून निवडणूक लढवत असलेले राणे यांनी रत्नागिरीतील प्रचार सभेत व्यस्त असताना त्यांनी दिलेल्या मुलाखतीत मला लोकांचा उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला आहे. महायुतीतील सर्व पक्षांचा भक्कम पाठिंबा आहे. त्यामुळे मी सहज निवडून येईन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खास गप्पा मारताना राणे म्हणतात, “मी सेनेत असताना त्यांनी मला मुख्यमंत्री बनण्याच्या त्यांच्या महत्त्वाकांक्षेला धोका म्हणून पाहिले. मी सोडल्यानंतरही उध्दव ठाकरे बदल्याच्या भावनेने पाहत राहिले. माझ्या मुंबईतील घरातील बांधकामावर त्यांनी कारवाई सुरू केली, मला तुरुंगात टाकण्यासाठी खोटा गुन्हा दाखल केला. मी शरण जावे अशी त्याची अपेक्षा होती. मी केले नाही. त्याने माझ्याशी जे केले त्याची किंमत जनता मतपेटीतून देईल.”

मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला ही लोकसभेची जागा उद्योगमंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत यांच्यासाठी हवी होती. ते नाराज असावेत?,असा प्रश्न राणे यांना विचारण्यात आला. त्यावेळी राणे म्हणाले की, ते जागा मागत होते.पण ते आधी होते.एकदा माझ्या नावाची घोषणा झाल्यावर उदय आणि किरण दोघेही आले आणि त्यांनी मला सांगितले की ते माझ्या विजयासाठी काम करतील. ते प्रचारात सहभागी होताना दिसत आहेत.

जैतापूर अणु प्रकल्प आणि नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प यांसारखे कोकणातील मोठे प्रकल्प अलीकडे रखडले आहेत. प्रदेशाचा मोठा भाग तुमच्या मतदारसंघात येत असल्याने तुम्ही इथल्या विकासाबाबतच्या चिंता दूर करत आहात का? या प्रश्नांवर राणे यांनी विकासात कोकण मागे पडत असेल तर त्याला उद्धव ठाकरे जबाबदार आहेत, असे स्पष्ट मत मांडले. उध्दव ठाकरे यांना प्रत्येक प्रकल्पात वाटा हवा असतो. त्यांनी जैतापूरला विरोध केला कारण कोळसा आधारित वीज उत्पादकांनी त्यांच्याकडे लॉबिंग केले. हा प्रकल्प पूर्ण झाला असता तर या प्रदेशात ₹३ लाख कोटींची गुंतवणूक झाली असती आणि छोटे कारखाने आणि नोकऱ्या निर्माण झाल्या असत्या. स्वतःच्या स्वार्थापोटी उद्धव यांनी हे होऊ दिले नाही, असा आरोप राणे यांनी यावेळी केला. मात्र,स्थानिक लोकही या प्रकल्पांना विरोध करत होते. त्यांना खोटे सांगितले गेले. आम्ही त्यांना प्रकल्पाचे फायदे पटवून दिले आणि नंतर बहुतेकांनी त्यांना संमती दिली.

Recent Posts

उद्धव ठाकरे डरपोक, पराभव दिसू लागल्याने डोक्यावर परिणाम झाल्यामुळे निराधार आरोप; आशिष शेलारांचे टीकास्त्र

आधी त्यांनी ईव्हीएम मशीनच्या नावाने बोंबा ठोकल्या मग मतांच्या टक्केवारीवर प्रश्नचिन्ह उभे केले आता बोटाच्या…

16 mins ago

Sanjay Raut : पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल!

ऐन निवडणुकीच्या काळात राऊतांना 'ते' वक्तव्य चांगलंच भोवणार मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत…

3 hours ago

Accident news : चारधामसाठी निघालेल्या भाविकांच्या ट्रॅव्हल्सने पेट घेतला अन्…

बुलढाणा बस दुर्घटनेची पुनरावृत्ती होता होता वाचली! बुलढाणा : गतवर्षी जून महिन्यात बुलढाणा येथे एक…

4 hours ago

Mihir kotecha : लोकसभेच्या गेटबाहेर गुटखा विकणारा खासदार पाठवायचाय की तुमचा सेवक पाठवायचाय?

कालच्या राड्याप्रकरणी मिहिर कोटेचा यांचा मुंबईकरांना सवाल मविआच्या २५-३० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल; ५ जण पोलिसांच्या…

5 hours ago

Kolhapur news : मुलाला वाचवताना तिघांचा नदीत बुडून मृत्यू! कोल्हापुरात घडली भीषण दुर्घटना

हसन मुश्रीफांनी घटनेची दखल घेत तातडीने आर्थिक मदत करण्याच्या दिल्या सूचना कोल्हापूर : कोल्हापुरातून (Kolhapur)…

5 hours ago

Gurucharan Singh : गेल्या २५ दिवसांपासून बेपत्ता गुरुचरण सिंग अखेर घरी परतले!

कारण सांगताच घरचेही अवाक नवी दिल्ली : 'तारक मेहता का अलटा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतून…

6 hours ago