श्रीनगर : श्रीनगरच्या रंगरेथ भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. या भागात अजून काही दहशतवादी असल्याची माहिती मिळत आहे. या भागात मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आला आहे.
श्रीनगरच्या रंगरेथमध्ये दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. या माहितीवरून सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली. सुरक्षा दलाने कडक घेराव घातल्याचे पाहून दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला.
मात्र संयम दाखवत दहशतवाद्यांना शरण येण्यास सांगण्यात आले. त्यासाठी त्यांना अनेकवेळा संधीही दिली. तरीसुद्धा दहशदवाद्यांनी गोळीबार सुरूच ठेवल्यामुळे सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले. यात दोन दहशतवादी ठार झाले. त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही.
नवी दिल्ली : काँग्रेसने आज उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी मतदारसंघातून काँग्रेस उमेदवारांची घोषणा केली.…
मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी महामुंबई मेट्रो प्रशासनाचा निर्णय मुंबई : मतदान (Voting) हा प्रत्येक नागरिकाचा हक्क…
दहा दिवसांनंतर समोर आली मोठी अपडेट नवी दिल्ली : 'तारक मेहता का उलटा चष्मा' (Taarak…
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (LS polls) पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्ह्यात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून,…
नगर : नगर जिल्ह्यातील कोपर्डी गावात (ता. कर्जत) विवस्त्र करून मारहाण करण्यात आल्याने येथील दलित…
नगर : नगर जिल्ह्यातील कोपर्डी गावात (ता. कर्जत) अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याच्या…