गुना : ‘पंतप्रधान मोदींनी या देशाच्या विकासात एससी, एसटी आणि ओबीसींना प्राधान्य दिले. दुसरीकडे या देशातील संपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. काँग्रेसचा हेतू आम्ही पूर्ण होऊ देणार नाही. हा देश समान नागरी कायद्यावर (युसीसी) चालेल. हा आपल्या राज्यघटनेचा आत्मा आहे. आम्ही उत्तराखंडमध्ये यूसीसी आणले, आता देशभरात लागू करू. काँग्रेसला देशात मुस्लिम पर्सनल लॉ आणायचा आहे. पण, हा देश शरियतवर नाही, युसीसीवर चालेल, असे प्रतिपादन करत गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाले. आता तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारांचा प्रचार सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी गुना लोकसभा मतदारसंघात सभा घेत काँग्रेसवर जोरदार टीका केली.
‘काँग्रेस ओबीसीविरोधी पक्ष आहे. अनेक वर्षांपासून ओबीसी प्रवर्गातील लोकांना केंद्रीय संस्थांमध्ये आरक्षण दिले जात नव्हते. काँग्रेसने ७० वर्षे आपल्या मुलाप्रमाणे कलम ३७० वाढवले, तर पंतप्रधान मोदींनी हे कलम ३७० रद्द केले, असे अमित शहा म्हणाले.
‘पंतप्रधान मोदींनी या देशातून दहशतवाद आणि नक्षलवाद संपवला. आता ही निवडणूक देशाला तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनवण्याची निवडणूक आहे. पंतप्रधान मोदींनी देशात १ कोटी लखपती दीदी निर्माण केल्या, आता ही निवडणूक ३ कोटी मातांना लखपती दीदी बनवण्याची निवडणूक आहे. मोदींनी १० वर्षात देशातील कोट्यवधी गरीब जनतेसाठी खूप कामे केली आहे’, असेही शहा यावेळी म्हणाले.
पंचांग आज मिती वैशाख शुद्ध प्रतिपदा ०६.२३ पर्यंत. नंतर द्वितीया शके १९४६. चंद्र नक्षत्र कृतिका.…
देशात तिसऱ्या टप्प्याच्या लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले. भाजपा विरुद्ध इंडिया आघाडीच्या लढाईत आता आरक्षणाचा…
मुंबई डॉट कॉम: अल्पेश म्हात्रे मुंबई महानगर क्षेत्रातील कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, अंबरनाथ…
माझे कोकण: संतोष वायंगणकर महाराष्ट्रातील कोकणची भूमी म्हणजे परमेश्वराला पहाटेच्या वेळी पडलेले सुंदर स्वप्न असं…
मुंबई: सनरायजर्स हैदराबादने लखनऊ सुपरजायंट्सला १० विकेटनी हरवले आहे. लखनऊने पहिल्यांदा खेळताना १६५ धावांची सन्मानजनक…
सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या १५० वर्ष जुन्या इमारतीचे पावसाळ्यापूर्वी…