मुंबई : बेस्टला आर्थिक तोट्यातून बाहेर आणण्यासाठी आणि बेस्टचे प्रवासी वाढविण्यासाठी बेस्ट विविध योजना राबवत असते. आता देखील बेस्ट उपक्रमाने बस पास आणि दैनंदिन तिकिटामध्ये बचत करणारी योजना आणली आहे. त्यानुसार ७२ प्रकारच्या विविध नव्या योजनांमधून प्रवासी आपल्याला हवी असलेली योजना निवडणार आहेत.
लोकलनंतर मुंबईची दुसरी जीवनवाहिनी म्हणजे बेस्टकडे पाहिले जाते. बेस्ट उपक्रमाच्या बसमधून दिवसाला २७ ते ३० लाख प्रवासी प्रवास करतात. कामानिमित्त दिवसातून बऱ्याचदा अनेकांना बेस्टने प्रवास करावा लागतो. अशा प्रवाशांसाठी बेस्ट उपक्रम आता नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एकात्मिक तिकीट प्रणाली) आणि मोबाईल अॅप सुविधा आणणार आहे. हे कार्ड घेतानाच प्रवाशांना एक मोबाईल अॅप डाऊनलोड करून कार्डला मोबाईल अॅपची जोड दिली जाईल. त्याद्वारेच या योजनेचा लाभ प्रवाशांना घेता येणार आहे. विना वातानुकूलित आणि वातानुकूलित बस प्रवाशांना ही सुविधा मिळणार आहे. या योजनेनुसार दोन आठवडे, चार आठवडे आणि दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी फेऱ्या, दिवस यावर आधारित निवडक भाडे टप्प्यात प्रवास करता येणार आहे.
यापूर्वी देखील बेस्टच्या मॅजिक पास म्हणजे ४० रुपयांच्या तिकिटावर दिवसभर प्रवास करण्याची मुभा दिली होती. मात्र आता या नवीन योजनेचा प्रवाशांना अधिक फायदा होणार आहे.
मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…
संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…
दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…
चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…
काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…
नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…