Sanjay Dutt : तलवारीमुळे डोके फुटले; शूटिंगदरम्यान संजय दत्त थोडक्यात बचावला!

Share

मुंबई : ‘डबल आईस्मार्ट’ या चित्रपटाच्या (Double iSmart) शूटिंग दरम्यान अभिनेता संजय दत्तच्या (Sanjay Dutt) डोक्याला तलवार लागल्याने या अपघात तो गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला टाके मारावे लागले.

संजय दत्त सध्या दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीमध्ये एन्ट्री केल्याचे पहायला मिळत आहे.

लवकरच त्याचा ‘डबल इस्मार्ट’ हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान संजय दत्तच्या डोक्याला टाके पडल्याचे सांगितले जात आहे. ’डबल इस्मार्ट’ या सिनेमाचे बँकॉकमध्ये शूटिंग सुरु आहे. तलवारबाजीचा सीन शूट करत असताना संजय दत्तचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या डोक्याला टाके पडले आहेत.

त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. परंतु संजय दत्तने उपचार घेतल्यावर शुटिंग पूर्ण करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गेल्या आठवड्यात घडली होती आणि आता संजय दत्त पूर्णपणे बरा असल्याचे सांगितले जात आहे. ‘डबल इस्मार्ट’ हा संजय दत्तचा पहिला तेलुगू सिनेमा आहे.

संजय दत्तने ‘केजीएफ चॅप्टर २’ या सिनेमाच्या माध्यमातून कन्नड मनोरंजन सृष्टीमध्ये एन्ट्री केली होती. यानंतर त्याचा ‘लियो’ हा सिनेमा तामिळ भाषेत आहे. या सिनेमातून तो तामिळ मनोरंजनसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे.

Tags: sanjay dutt

Recent Posts

LS Election : शिवतिर्थावर आज ‘मोदी-राज’ अवतरणार!

मुंबई : मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार (LS Election) करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी,…

3 hours ago

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, दि १७ मे २०२४.

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध नवमी ८.४८ पर्यंत नंतर दशमी शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा…

3 hours ago

मोदींच्या रोड शोमुळे मतदारांचा उत्साह शिगेला

देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेकाॅर्डब्रेक गर्दीच्या सभा होताना दिसतात; परंतु पंतप्रधान मोदी यांना जवळून…

6 hours ago

अवयवदान प्रबोधनाची चळवळ

कुमार कदम शरीरातील केवळ कोणता तरी महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यामुळे मृत्यूशी निकराची झुंज देत असलेली…

7 hours ago

आरोग्य विम्यासाठी वयाची अट काढली, पण…

अभय दातार, मुंबई ग्राहक पंचायत मागच्या महिन्यात एक महत्त्वाची बातमी सगळीकडे प्रसिद्ध झाली, ती म्हणजे…

7 hours ago

पहिल्या चार टप्प्यातच झालाय महाविकास आघाडीचा सुपडा साफ

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला दावा मुंबई : महाराष्ट्रात चार चरणांच्या निवडणूक पूर्ण झाल्या आहेत. २०…

11 hours ago