नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली पोलिसांनी दहशतवादी संघटना आयएसआय यांच्या एका मोठ्या कटाचा खुलासा केला आहे. दिल्ली पोलिसांनी जानेवारी २०२३ मध्ये दिल्लीतील जहांगीरपुरी भागातून दोन दहशतवाद्यांना अटक केली होती.
नौशद आणि जगजीत या दहशतवाद्यांना दिल्लीतील लाल किल्ल्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकांवर गोळीबार करण्यास सांगितले होते. या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने १० मे रोजी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे. या दहशतवादी संघटनांचा हा कट दिल्ली पोलिसांनी उधळून लावला आहे. त्यामुळे देशात होणाऱ्या एका मोठ्या हल्ल्यापासून बचाव झाला असल्याचे देखील म्हटले जात आहे.
यासोबतच त्यांना पंजाबमधील बजरंग दलाचे नेते आणि हरिद्वारमधील साधूंवर देखील हल्ला करण्याचा कट रचला होता. पंजाबमधील बजरंग दलाच्या नेत्यांच्या हत्येसाठी या दहशतवाद्यांना दोन लाख रुपये देखील देण्यात आले होते, अशी माहिती पुढे आली आहे.
तसेच, नौशद आणि जगजीत या दहशतवाद्यांनी आपल्या म्होरक्याचा विश्वास मिळवण्यासाठी एका तरुणाची हत्या देखील केली होती. दोघांनी दिल्लीतील एका तरुणाचे अपहरण केले आणि नंतर त्याची हत्या केली. त्याच्या हत्येचा व्हीडिओ त्या दोघांनी त्यांच्या म्होरक्यांना पाठवला. त्यानंतर म्होरक्याचा विश्वास त्या दोघांवर बसला. दरम्यान, अटक केलेल्या दहशतवाद्यांनी मान्य केले की, ते पाकिस्तानीतील त्यांना सांभाळणाऱ्या चार लोकांच्या संपर्कात होते. दोघांनी पोलिसांना सांगितले की ते पाकिस्तानातील नजीर भट, नासिर खान, नजीर खान आणि हिजबुल मुजाहिद्दिन या लोकांच्या संपर्कात होते. या सगळ्यांना आयइएसच्या आदेशांवर काम करण्यास सांगितले जात होते.
CSK vs RCB: आज बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेजर्स बंगळुरु आमने-सामने…
मायभाषा: डॉ. वीणा सानेकर महाराष्ट्र ही शिक्षणाची प्रयोगशाळा आहे, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार…
स्टेटलाइन: डॉ. सुकृत खांडेकर अठराव्या लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी, २० मे रोजी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या…
मुंबई: विराट कोहलीने चेन्नई सुपरकिंग्सविरोधात आयपीएल सामन्यात रेकॉर्ड्सची बरसात केली आहे. विराट कोहलीचे अर्धशतक तीन…
नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक २०२४च्या(loksabha election 2024) पाचव्या टप्प्याचे मतदान २० तारखेला होणार आहे. यातच…
काशी व मथुरेमध्ये मंदिर बांधण्यासंदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा…