मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी अटक झाली. लवकरच मानेला पट्टा लावणाऱ्याला अटक झाली, तर आश्चर्य वाटण्याची गरज नसल्याचा हल्लाबोल आमदार नितेश राणे यांनी केला. याबाबतचे ट्विटही राणे यांनी सोशल मीडियावर केले.
आमदार राणे म्हणाले की, दिल्ली सरकारच्या मद्यधोरण गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने गुरुवारी रात्री आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. या प्रकरणी संजय राऊत यांनी सकाळी भाजपा नेत्यांवर आगपाखड केली आहे. त्याला राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राणे यांनी केजरीवाल यांच्या मातोश्रीवरील भेटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. केजरीवाल यांची भेट कशासाठी होती? असा सवाल करत ती भेट राजकीय होती की, मद्य घोटाळ्यात मातोश्री कनेक्शन दडले होते? असा आरोप राणे यांनी केला.
महाविकास आघाडीचे सरकार असताना दिल्ली सरकारने मद्यधोरणावर शिक्कामोर्तब केले होते. तेव्हा उद्धव ठाकरे सरकारने राज्यात ५० टक्के कर सवलत जाहीर केली होती. त्यामुळे मातोश्रीच्या भेटीत खोक्यांची की कंटेनरची चर्चा झाली? असा सवालही राणे यांनी उपस्थित केला. तसेच मद्य घोटाळ्याचे मातोश्री कनेक्शन काय आहे? याचे उत्तर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी द्यावे, असे आव्हान राणे यांनी दिले.
'या' शुभ दिवशी झाला बाळाचा जन्म मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam)…
जाणून घ्या देशात किती टक्के मतदान? मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksbaha Election) पाचव्या टप्प्यात देशातील…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) राज्यात आज पाचव्या…
मुंबई: जिओ आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक रेंजमध्ये डेटा प्लान सादर करत असते. काहींना महिन्याभराची…
मुंबई: मध आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. मधामध्ये व्हिटामिन, मिनरल्स आणि अँटीव्हायरल गुण आढळतात. उन्हाळ्यात…
मुंबई: राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना रद्द होण्यासोबतच आयपीएलच्या लीग सामन्यांची सांगता…