मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी सध्याच्या भारतीय संघातील खेळाडूंची चांगलीच कानउघडणी केली आहे. आत्मविश्वास असणं ही जमेची बाजू असली तरी आपल्याला सगळं येतं. आपण सर्वज्ञ आहोत, असं वाटू लागणं योग्य नाही. तुम्ही आत्मविश्वासू असता हे ठीक आहे. पण तुम्हाला कोणाला काहीच विचारायची गरज वाटत नाही. अनुभवी खेळाडूंकडून सल्ला घ्यावासा वाटत नाही, हे कही बरं नव्हे, अशा शब्दांत कपिल देव यांनी भारतीय संघातील खेळाडूंना सुनावलं.
ते पुढे म्हणाले, पैसे आल्यावर अहंकारदेखील येतो. काही खेळाडू असेही आहेत की त्यांच्यातला अहंकार त्यांचा सुनील गावसकर यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूकडून सल्ला घेण्याच्या आड येतो. सुनिल गावसकर तिथे आहेत. तुम्ही त्यांच्याशी का बोलत नाहीत?, असा प्रश्न देव यांनी उपस्थित केला.
भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी काही दिवसांपूर्वीच सध्याच्या भारतीय क्रिकेटपटूंवर भाष्य केलं होतं. भारतीय क्रिकेटपटू क्वचितच आपल्याकडून सल्ला घेण्यास येतात, असं गावसकर म्हणाले होते. ‘राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, व्हिव्हीएस लक्ष्मण माझ्याकडे नेहमी यायचे. त्यांच्या काही समस्या घेऊन ते यायचे. माझी काही निरीक्षणं त्याबद्दल असायची. त्याबद्दल मी त्यांच्याशी मोकळेपणानं बोलायचो,’ असं गावसकरांनी म्हटलं होतं.
मुंबई : जून महिन्याला सुरुवात झाली असल्यामुळे प्रत्येकजण मान्सूनची (Monsoon) वाट पाहत आहे. दोन दिवसापूर्वीच…
'या' तारखेला होणार परीक्षा मुंबई : मध्य रेल्वेकडून (Central Railway) सीएसएमटी (CSMT) आणि ठाणे (Thane)…
पोलिसांसह बाॅम्ब शोध पथक घटनास्थळी दाखल पुणे : पुण्यात कार अपघात, गोळीबार, हल्ला अशा घटना…
बाप लेकानंतर आई गजाआड पुणे : पुण्यातील हिट अँड रन (Hit And Run) प्रकरणात नवनवीन…
पंचांग आज मिती वैशाख कृ. नवमी ७.२६ पर्यंत नंतर दशमी शके १९४६, चंद्र नाक्षत्र उ…
जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून केवळ आपल्या भारत देशाचा उल्लेख होत आहे. त्याच लोकशाही…