नवाब मलिकांच्या राजीनाम्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही – चंद्रकांतदादा पाटील

Share

कोल्हापूर : मंत्री नवाब मलिकांचा राजीनामा घेतला नाही तर भाजप अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला आहे. आज कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महाविकास आघाडीवर ताशेरे ओढले. नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर त्यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी करताना चंद्रकांतदादा पाटील यांनी नवाब मलिक यांना उद्धव ठाकरे स्वत: बोलवून राजीनामा घेत नाहीत तोपर्यंत भाजपचे आंदोलन सुरू राहील, असे सांगितले.

मराठा आरक्षणाच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आमरण उपोषण केले. या उपोषणासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले. संभाजीराजे यांच्या उपोषणासंदर्भात बोलताना चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, की संभाजीराजे यांना मराठा समाजाच्या मागण्यांसाठी उपोषण करावे लागले हे दुर्दैव असून संभाजीराजे यांना सरकारने आतापर्यंत कितीतरी तारखा दिल्या आहेत. संभाजीराजेंचा असा समज झाला असेल की आपला विजय झाला तर तो आनंद क्षणभंगुर आहे. तर भाजप मराठा समाजाच्या मागण्यांसाठी रस्त्यावर लढत राहील, असेही ते पुढे म्हणाले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी गेले आठवडाभर आंदोलन करत आहेत. या आंदोलनावरूनही चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला. महावितरणाच्या भोंगळ कारभाराविरोधात आणि शेतीपंपाची विजबिले दुरूस्तीसाठी राजू शेट्टी यांनादेखील उपोषण करावा लागतोय हे काही योग्य नाही असे ते म्हणाले. तसेच गेले आठवडाभर चालू असलेल्या आंदेलनाची शासनाने दखलही घेतली नाही त्यामुळे आम्ही राजू शेट्टी यांच्या आंदोलनात सहभागी होणार आहोत, असे ते यावेळी म्हणाले.

Recent Posts

‘आरटीई’अंतर्गत शाळा प्रवेशाची प्रक्रिया मुंबईत सुरू

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…

8 hours ago

मलाच मुख्यमंत्री बनवा अन्यथा मातोश्रीतले बिंग फोडेन!

संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…

9 hours ago

Lok Sabha Election : राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी

दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…

10 hours ago

Cloudburst : अरे बाप रे! मे महिन्यात इतका पाऊस कसा झाला? हवामान विभागालाही पडला प्रश्न

चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…

10 hours ago

काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी

काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…

10 hours ago

पतंजलीच्या उत्पादनाचा दर्जा निकृष्ट! सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल, तिघांना तुरुंगवास

नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…

10 hours ago