ठाणे : ठाणे स्थानक परिसरातून रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. त्यातच रिक्षाचालक प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारणी, प्रवाशांशी हुज्जत घालणे, वाहतूक नियमांची पायमल्ली केली जाते. अशा मुजोर रिक्षा चालकांना शिस्त लागण्यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने धडक मोहीम राबवली आहे.
बेशिस्त रिक्षा चालकांना शिस्त लागण्यासाठी या विभागाने १ ते १७ एप्रिल या काळात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांवर कायदेशीर कारवाई केली होती. गेल्या सतरा दिवसात तब्बल ६५० रिक्षा चालकांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून तब्बल १० लाखांचा दंड वसूल केला असल्याची माहिती सहाय्यक परिवहन अधिकारी प्रसाद नलवडे यांनी दिली.
पोलिसांनी ठरवून दिलेल्या रांगेत उभे न राहता हे मुजोर रिक्षा चालक रेल्वे फ्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ च्या प्रवेशद्वारावर उभे राहून प्रवाशांची दिशाभूल करून गाडीत बसवतात आणि जास्त भाड्याची आकारणी करतात. अशा रिक्षा चालकांवर विभागाने ठाणे प्रादेशिक परिवहन कारवाई केली आहे. बेशिस्त रिक्षा चालकांना शिस्त लागेपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार आहे. त्यामुळे या रिक्षा चालकांचे धाबे दणाणले आहेत.
नियम डावलून जर कोणी रिक्षा चालक वर्तन करताना आढळून आला तर त्याच्यावर कडक कारवाई होणार आहे. तसेच नियमभंग करणाऱ्या रिक्षाचालकांविरुद्ध दंडात्मक कारवाईसह परवाना निलंबन आणि लायसन्स निलंबनाची देखील कारवाई करण्यात येणार आहे, असे ठाणे येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी सांगितले.
मुंबईतील धार्मिक स्थळांपैकी एक महालक्ष्मी मंदिर आहे. मुंबईतील महालक्ष्मीचे वास्तव्य ज्या ठिकाणी आहे, तो सारा…
माधवीताई म्हणतात की, “आजकालच्या तरुण पिढीचे आयुष्य अतिशय धावपळीचे झाले आहे. त्यांनी आयुष्यात थोडे विसाव्याचे…
नॉस्टॅल्जिया - श्रीनिवास बेलसरे यशवंत पेठकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘मोलकरीण’ हा १९६३ साली आलेला एक…
विशेष - भालचंद्र ठोंबरे अर्जुनाला चार बायका होत्या. द्रौपदी, सुभद्रा, चित्रांगदा व नागकन्या उलूपी. सुभद्रेचा…
संवाद - गुरुनाथ तेंडुलकर जगात कोणत्याही माणसाचा जन्म आणि मृत्यू या दोन्ही गोष्टींवर अधिकार चालत…