ठाणे : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीमध्ये ठाण्याच्या जागेवरुन (Thane Loksabha) मतभेद होत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना व भाजपा हे दोन्ही पक्ष या जागेवर आपापला दावा सांगत होते. अखेर भाजपाने सामंजस्याची भूमिका घेत ही जागा शिवसेनेला दिली आहे. या ठिकाणी शिवसेनेचा हुकुमी एक्का नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर कल्याण लोकसभेची (Kalyan Loksabha) जागा देखील शिवसेनेला देण्यात आली असून या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका जाहीर सभेत कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देणार असल्याचे संकेत दिले होते. यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, ठाण्याचा प्रश्न अद्याप सुटला नव्हता. आता तोही सुटला असून नरेश म्हस्के लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधून शिवसेनेने आपल्या दोन्ही उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
मुंबईत जे घडतं, त्याची चर्चा देशभर होते. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यांतून लोक…
फॅमिली काऊन्सलिंग: मीनाक्षी जगदाळे काही लोकांना सतत खोटं बोलण्याची सवय असते. छोट्या-छोट्या गोष्टींवरून अनेकदा सातत्याने…
इंडिया कॉलिंग: डॉ. सुकृत खांडेकर लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे पाच टप्पे पूर्ण झालेत. मुंबईसह महाराष्ट्रात सर्व…
मुंबई: कोलकाता नाईट रायडर्सची अय्यर जोडीने कमाल केली. कोलकाता नाईट रायडर्सने हैदराबादला हरवत दिमाखात आयपीएलच्या…
मुंबई: झारखंडच्या साहिबगंज जिल्ह्यातून हैराणजनक बातमी समोर आली आहे. येथे रील बनवण्याच्या नादात तरुणाने १००…
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील अनेक मतदान केंद्रावर मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे नसल्याचे…